पंढरपूर Ststrike News : राज्य सरकार आंदाेलन चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु आम्ही राज्य परिवहन महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण हाेत नाही ताेपर्यंत आमचा लढा सुरु ठेवणार असल्याचे एस.टी.कामगार संघर्ष युनियनचे सरचिटणीस शशांक राव shashank rao यांनी येथे नमूद केले. एसटी कामगारांना पाठींबा देण्यासाठी शशांक राव हे मुंबईहून पंढरपूर येथे आले आहेत.
शशांक राव म्हणाले राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या सर्व जागा ताब्यात घ्याव्यात. एसटी कर्मचा-यांचे राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करावे या मागणीसाठी कर्म-यांनी आत्महत्या केल्या. तरी सरकारला पाझर फुटला नाही. हे दुर्देव आहे.
उच्च न्यायालयाकडे बोट दाखवून परिवहन मंत्री अनिल परब आणि राज्य सरकार त्यांची जबाबदारी झटकत आहे. राज्य सरकारने विलीनिकरणाचा निर्णय घेतल्यास न्यायालयास देखील काेणती हरकत राहणार नाही. परंतु सरकारची सकारात्मक भुमिका दिसत नाही अशी खंत राव यांनी व्यक्त केली. कामगाराची मागणी रास्त असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी रविवारी पत्रव्यवहार केला आहे. त्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा एसटी कर्मचा-यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी पंढरपूरात pandharpur उपाेषणास बसल्याचे राव यांनी नमूद केले.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.