वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा एकदा गर्जना केलीय. त्यामुळेच जुलैच्या पहिल्याच आठवड्यात अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहू लागल्याने हवामान विभागाने राज्याला ऑरेंज अलर्टचा इशारा दिलाय..
जुलैच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर पुढील 4 दिवसांसाठी हवामान विभागाने ऑरेंज आणि यलो अलर्ट दिलाय .कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आलाय..पाहूयात.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड
कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक घाट
अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे... दरवर्षीप्रमाणे पावसात प्रशासकीय यंत्रणेची लक्तरं वेशीला टांगली जाऊ नयेत म्हणून यंत्रणा आधीपासूनच अलर्ट मोडवर आहेत. ज्याठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा ठिकाणी एनडीआरएफच्या टीमही तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र अतिमुसळधार पावसामुळे होणारा धोका टाळण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घ्यायला हवी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.