Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सभा; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

औरंगाबादमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आज सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे (Raj Thackeray) हे शनिवारी औरंगाबाद (Aurangabad) मध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत. या सभेसाठी मनसेचे (MNS) कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औरंगाबादेमध्ये दाखल होत आहेत. या सभेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

या सभेची आठवडाभरापासून राज्यभर चर्चा सुरू आहे. पाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे काढण्याविषयी राज ठाकरे यांनी राज्य शासनाला ३ मेचा अल्टीमेटम दिला आहे त्यावर आज पुन्हा राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यासोबतच हिंदुत्वाची गर्जना करत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे ही आपली ताकद दाखवणार अशी चर्चा आहे. या सभेसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे.

दुसरीकडे या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद हे संवेदनशील शहर असल्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त शहरात लावलेला आहे. आता सभेत राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या सभेनंतर राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Bhosle Photos: 'अवखळ हासरी, अल्लड लाजरी; दिसते चंद्राची कोर साजरी...' रूपालीचं देखणं रूप

West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये राडा! मतदानादरम्यान दोन गट आपापसात भिडले, नेत्याच्या गाडीवर तुफान दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्च

Maharashtra News Live Update: गोवंडीत उभ्या असलेल्या वाहनात सीएनजी स्फोट

Hair Care: हेअर बोटॉक्स करायचा विचार करताय? मग जाणून घ्या ३ महिन्यांनंतर होणारे साइड इफेक्ट्स

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा ईकेवायसीनंतरही बंद होणार लाभ; ३० एप्रिलनंतर मिळणार नाही ₹१५००; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT