Breaking : अखेर 'त्या' वादग्रस्त वक्तव्याबाबत मंत्री गुलाबराव पाटलांनी मागितली माफी... SaamTv
महाराष्ट्र

Breaking : अखेर 'त्या' वादग्रस्त वक्तव्याबाबत मंत्री गुलाबराव पाटलांनी मागितली माफी...

गुलाबराव पाटील य़ांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं असा इशारा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला होता.

भूषण अहिरे

धुळे : शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी बोदवड नगरपंचायत प्रचार भरसभेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं 'माझ्या मतदारसंघातील रस्ते हे हेमा मालिनीच्या (Hema Malini) गालासारखे केले असल्याचं ते म्हणाले होते. (Minister Gulabrao Patil apologized for the controversial statement)

हे देखील पहा -

त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावरती भाजपकडून जोरदार टीका सुरु होतीच शिवाय, 'गुलाबराव पाटील यांनी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून गुलाबराव पाटील यांनी केलेले विधान करणे हे निषेधार्ह' असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी म्हटलं होतं तसंच पाटील य़ांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं असा इशारा देखील चाकणकर यांनी दिला होता.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवरती अखेर मंत्री गुलाबराव पाटील यांनी मागितली माफी मंत्री गुलाबराव पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो असं गुलाबराव पाटील म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT