Marathwada Rain: मुसळधार पावसाचा फटका; दोन दिवसात 31 जणांचा बळी Saam Tv
महाराष्ट्र

Marathwada Rain: मुसळधार पावसाचा फटका; दोन दिवसात 31 जणांचा बळी

राज्याच्या मराठवाडा भागाला मुसळधार पावसाचा जबर फटका बसला आहे. तर या दोन दिवसात तब्बल ३१ जणांचा बळी गेल्याची माहिती मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद : राज्याच्या मराठवाडा Marathwada भागाला मुसळधार पावसाचा जबर फटका बसला आहे. तर या दोन दिवसात तब्बल ३१ जणांचा बळी गेल्याची माहिती मिळत आहे. तर पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. फक्त औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यात तब्बल ४ जणांचा मृत्यू झाला, तर नांदेड Nanded जिल्ह्यात ७ जणांनी प्राण गमवावे आहेत. मराठवाड्यात १२० ते १५० पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. तर तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

हे देखील पहा-

औरंगाबादमध्ये पावसाचे रौद्र रुप

पावसाची रिपरिप औरंगाबादेत ०७ सप्टेंबर रोजी दिवसभर सुरु होती. मात्र संध्याकाळी ७.१० वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. विजांचा कडकडाट आणि ढंगांच्या कडकडाटात काही काळ पाऊस चालूच होता. या मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात पिकाचे Crops मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पिशोर परिसरात पिकांचे नुकसान;

कन्नड Kannad तालुक्यातील पिशोर भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अंजना-पळशी मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत होते. परिणामी अंजना नदीला पूर आला. त्यामुळे दहा गावांचा संपर्क तुटला होता. सोमवारी रात्रीपासून पिशोरला मुसळधार पाऊस होत होता. त्यामुळे पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Death: भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सामन्यादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका

Maharashtra Live News Update: पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार!

Mumbai Local: पश्चिम रेल्वेवरील लोकल वेळेत धावणार, नवीन मार्गिकेचं काम पूर्ण; कधीपासून होणार सुरु?

Bollywood Breakup: तारा आणि वीरनंतर बी-टाऊनच्या आणखी एका कपलचं ब्रेकअप; दोन वर्षाचं रिलेशन तुटलं...

Baba Vanga: बाबा वेंगांनी सांगितली 2026 मधली तिसऱ्या महायुद्धापासून एलियन्सपर्यंतची भाकीतं

SCROLL FOR NEXT