बुलढाण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनची सुरुवात मोठ्या थाटात संपन्न झाली, सुरुवातीला स्थानिक हुतात्मा स्मारक परिसरात असलेल्या वामनदाद कर्डक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान रॅली काढण्यात आली, त्यानंतर गर्दे सभागृहात साहित्य संमेलनास सुरुवात झाली शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रातील घराघरात पोहोचविणारे महाकवी वामनदादा कर्डक यांना वैचारिक आदरांजली वाहण्यासाठी, आणि त्यांच्या साहित्यावर चिंतन मंथन करून साहित्याचा जागर व्हावा यासाठी बुलढाण्यात या दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन होत आहे.. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्याहस्ते आज संमेलनाचे उद्घाटन झाले, सुप्रसिद्ध कथाकार विलास सिंदगीकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थानी आहेत...
बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळच्या श्री घृष्णेश्वराचे थेट गाभाऱ्यातील दर्शन बंद करण्यात आले आहे. वाढत्या गर्दीमुळे निर्णय प्रशासनाने निर्णय घेतल्याने आता शिवभक्तांना प्रवशेद्वारावर शिवलिंग दर्शन घ्यावे लागणार आहे. वेरूळचे बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाऊन दर्शनाची परंपरा शनिवारी दुपारपासून खंडित झाली. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे हा निर्णय घेतला असून गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरच लिंगाची मूर्ती ठेवून दर्शनासाठी सोय केली आहे. श्री घृष्णेश्वर मंदिरात थेट गर्भगृहात (गाभाऱ्यात) जाऊन शिवलिंगावर डोके ठेवून, हात लावून दर्शन, अभिषेकाची अनेक वर्षांची परंपरा होती. महाशिवरात्री, श्रावण महिन्यांत गर्दी वाढली तरीही भाविकांना थेट दर्शन होते. सध्याही नाताळाच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी आलेल्या भाविकांची श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी रांग लागत आहे. शनिवारी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाल्याने दर्शनासाठी तीन ते चार तास लागत होते. मात्र, गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने दुपारी बारा वाजेपासून मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी गाभाऱ्यात जाण्याची परवानगी नाकारली आणि बाहेर प्रवेशद्वारावर सभामंडपासमोरच ज्योतिर्लिंग मूर्ती ठेवून बाहेरूनच दर्शन पद्धत सुरू केली. यानंतर भाविक दर्शन घेऊन लवकर बाहेर पडू लागले.
जळगाव दादर-भुसावळ दरम्यान धावणारी विशेष रेल्वे फेब्रुवारीपर्यंत चालेल. त्यामुळे जळगाव व भुसावळच्या प्रवाशांची मोठी सोय होईल. दादर येथून दर शुक्रवारी धावणारी ०९०४९ क्रमांकाची दादर-भुसावळ विशेष रेल्वे आता २७ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. ही रेल्वे दादर स्थानकावरून पहाटे १२ वाजून १५ मिनिटांनी सुटते आणि सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी जळगाव स्थानकावर पोहोचते. याच गाडीची परतीची फेरी म्हणजेच ०९०५० क्रमांकाची भुसावळ-दादर रेल्वे २७फेब्रुवारीपर्यंत दर शुक्रवारी धावणार आहे. ही रेल्वे सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी जळगाव स्थानकावर येते. त्यानंतर मुंबईकडे रवाना होते.
दोन मिनी बस मध्ये अपघात..
कारचालकाने अचानक रस्त्यात वाहन थांबवल्याने एक बस दुसऱ्या बस वर आढळली
या अपघातात बसचे नुकसान
बसमधील काही प्रवासी जखमी
प्रवासी आणि कार चालकामध्ये बाचाबाची..
अपघातामुळे वाहतुकी अडथळा
तिन्ही प्रमुख पक्ष ५०-५० जागा लढणार
पुणे महापालिका निवडणूक लढवण्यास महाविकास आघाडी जागा वाटपाचे सूत्र अखेर जवळपास निश्चित झाले
मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत अजून भुमिका नाही.आज चित्र स्पष्ट होण्याची शक्यता
एका वाहन चालकाने भर रस्त्यात बस थांबवून बस चालकावर हल्ला केल्याची घटना बदलापुरात घडलीय. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ ठरलाय. या मारहाणीचा व्हिडिओ एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीत केलाय.
-अमरावती येथील महापालिका निवडणुकीसाठी भाजपा, शिंदे सेना व युवा स्वाभिमान पार्टी या महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात येत असतानाच पुन्हा रखडले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी भाजपाचे राज्य निवडणूक प्रमुख व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीत येणार आहे. बैठक झाल्यानंतर दुपारी ४ वाजता अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.युतीचा आणी जागा वाटपचा मार्ग मोकळा करण्यासाठी खुद्द पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज दुपारी १२ वाजता अमरावतीत येणार आहे. ४ वाजेपर्यंत महायुतीतल्या घटकपक्षांशी चर्चा करून जागा वाटपाला ते अंतिम स्वरूप देण्याची शक्यता आहे. काही मार्ग निघाला नाही तर महायुती तुटण्याची शक्यता काहींनी वर्तविली आहे. कोणताही एक निर्णय आज जाहीर होणार असल्याचे सांगितल्या जात आहे.
दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या वाहन चालकांना अटकाव करण्यासाठी शहर पोलिसांकडून पुढील पाच दिवस शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली जाणार
शहरात 31 डिसेंबरला रात्री वाहतूक नियमांची उल्लंघन होणार नाही या दृष्टीने आधीपासूनच कारवाई तीव्र वाढवण्याच्या सूचना
पोलीस आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यामध्ये 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा उत्सव व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध उपाय योजना करण्याच्या सूचना
देशातील प्रसिद्ध उद्योगपती अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी आज बारामती दौऱ्यावर असणार आहेत.गौतम अदानींच्या हस्ते बारामतीत निर्माण करण्यात शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स च उद्घाटन सकाळी दहा वाजता पार पडणार आहे. यासाठी देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांची उपस्थिती असणार आहे.
महापालिका सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला खिंडार पडले असून माजी जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.
खोपोली हत्या प्रकरणी नऊ आरोपींना जेरबंद करण्याकामी रायगड पोलिसांना यश आले आहे. रविंद्र परशुराम देवकर, दर्शन रविंद्र देवकर, धनेश रविंद्र देवकर, उर्मीला रविंद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजु मोरे, सचिन दयानंद खराडे, दिलीप हरिभाऊ पवार अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. रायगडच्या खोपोली येथील नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भरदिवसा निघृणहत्या करण्यात आली. या प्रकरणातील प्रत्यक्ष मारेकरी पोलिसांच्या हाती लागले असले तरी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते भरत भगत हे फरार आहेत. या घटनेचा CCTV फुटेज आता समोर आला असून यामुळे पुन्हा एकदा बिडच्या संतोष देशमुख हत्याकांडाची आठवण ताजी झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला पुणे शहरातील 41 प्रभागांमध्ये असलेल्या 41 उमेदवारांचा प्रस्ताव दिला होता मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये ५०,५०,५० हा फॉर्म्युला आहे जिथे भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नाही तिथे आम्हाला स्थान दिलं जातं. महाविकास आघाडीच्या या खेळीला वंचित बहुजन आघाडी बळी पडणार नाही त्यामुळे सध्या तरी आमच्यात कुठलीही युती नाही असं स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरविंद तायडे यांनी घेतली आहे
मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे पंधरा जून रोजी झालेल्या भीषण अपघातात चार नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर सत्तावीस हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पुलाच्या कामाला त्वरित सुरुवात करण्याचे आदेश दिले होते. त्या यादेशानुसार स्थानिक आमदार आणि खासदारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आज अखेर कुंडमळा पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुलाचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि दुग्ध व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूल पडल्यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी १० ते १२ किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. आता नवीन पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुलभ होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेतही मोठी वाढ होणार आहे. पुलाचे काम सुरू होताच स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून हे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा प्रशासनाकडे व्यक्त करण्यात आले आहे.
संकटांचे स्वागत करायला शिका, संकटे तुम्हाला घडवतात अनुकूल परिस्थिती तुमच्यातील गुण बाहेर पडतात तत्पर निर्णय घेणारी माणसेच यशस्वी होतात असे प्रतिपादन शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेत ते बोलत होते. आपल्या मनातील सकारात्मक विचार हाच आपल्याला यशस्वी विषयावर घेऊन जातो. यशाचा धडा गिरवायला विचारांची पेरणी महत्त्वाची असते, ती पेरणी आत्ताच करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री, एपीजे अब्दुल कलाम, यांनी परिस्थितीचा कधीच भाऊ केला नाही. त्यांनी परिस्थितीवर मात करून आयुष्याचं सोनं केलं. अशा मार्मिक सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांनी दिला.. यावेळी मावळे चे खासदार श्रीरंग बारणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास काकडे यास अनेक मान्यवर उपस्थित होते
पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहे.. टायगर पॉईंट वरून लोणावळ्यातील निसर्ग सौंदर्य बघणे आणि येथील थंडगार हवेचा सुखद आनंद घेण्यासाठी टायगर पॉईंट वर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झालेली आहे.. मुंबईसह राज्यातून आपल्या स्वतःच्या खाजगी वाहनाने आल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र टायगर पॉईंट वर बघायला मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.