अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या या युद्धामुळे आखाती देशांतील वाहतूक आणि निर्यात व्यवस्थेवर परिणाम झाला असून त्याचा थेट फटका पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसतोय
- महामेट्रोचे हिंगणा मार्गावर वानाडोंगर परिसरात मेट्रो कार्य निर्माणाधिंन कार्य सुरू आहे...याच कामादरम्यान अपघात, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली
- नागपूरच्या वानाडोगरी परिसरात मेट्रोच्या कामादरम्यान मध्यरात्री घडला अपघात
- मेट्रो सेगमेंट बसवण्याचे काम सुरू असताना क्रेनमधील पट्टी अचानक तुटल्याने सेगमेंट खाली कोसळल्याची घटना घडली.
- घटनेनंतर कामगारांमध्ये काही काळ भीतीच वातावरण पसरल. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
- मेट्रो प्रकल्पाच्या हेवी मटेरियल लावण्याच काम सुदैवानं मध्यरात्री चालते, अन्यथा मोठी दुर्घटनेची भीती टाळता येत नाही...
- मेट्रोकडून जीवितहानी झाली नसल्याचं केलं स्पष्ट
केळीचे पीक अज्ञातांनी कापून नासधूस केल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी या गावातील हा प्रकार आहे. या गावातील जवळपास सहा ते सात शेतकऱ्यांची केळी आज्ञातांनी कापून टाकली. मध्यरात्री शेतात कोणी नसल्याचे पाहून अज्ञातांनी हे कृत्य केले. केळी सोबतच केळीतील ठिबक पाईपलाईन देखील आज्ञातांनी तोडून टाकली आहे. या प्रकारामुळे पार्डी गावातील जवळपास सहा ते सात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान आरोपीचा तात्काळ शोध घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
द्वारका अंडरपास कामात सापडली 125 वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी द्वारका सर्कलवर सुरू आहे अंडर पासचे काम
द्वारका सर्कलवर काम सुरू असताना 10 फूट रस्ता खोदल्यानंतर सापडली पाण्याने भरलेली विहीर
विहीर पूर्ण पाण्याने भरलेली असून तिच्यात पाण्याचे जिवंत झरे
पाण्याने भरलेली ही विहीर 1900 सालातील असल्याची स्थानिक नागरिकांची माहिती
या विहिरीचे प्रशासनाने जतन करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी
भविष्यात या विहिरीच्या पाण्याचा नाशिककरांना फायदा होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने या विहिरीचे जतन करण्याची मागणी
शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात खा. सुनिल तटकरे यांनी दाखल केला आब्रु नुकसानीचा दावा
आ. थोरवे यांच्यासह गुगल आणि गुगल LLC विरोधात माणगावच्या सत्र न्यायालयात दावा दाखल
27 डिसेंबर 2025 ला कर्जत येथे मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी आ. थोरवे यांनी मुलाखतीत तटकरे यांच्यावर केले होते गंभिर आरोप
रायगडमध्ये रक्तरंजित राजकरण, सुनिल तटकरे, कार्यकर्त्यांना जीवे ठार मारण्यात येत आहे आदी मुद्द्यांवर थोरवे यांनी दिली होती मुलाखत
०65 कोटी रूपयांचा दाखल केला आहे दावा
इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धाच्या परिणामांची झळ आता शेगावपर्यंत पोहोचली आहे. इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने गॅस सिलेंडर मिळत नसल्याने व गॅस सिलेंडरच्या दरवाढी मुळे छोटे व्यवसायिक वर संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे काही व्यवसायिकांनी आपले व्यवसाय बंद केले आहेत तर काहींनी खाद्य पदार्थचे दरवाढ़ केली आहे.. कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल चालकांनी चहा, नाश्ता आणि पोह्यांचे दर वाढवले आहेत. काही छोट्या हॉटेल्सना तर सिलेंडरअभावी दुकाने बंद ठेवावी लागली. दरम्यान, सर्वांना घरगुती गॅस मिळेल, नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे.
राज्यावर अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असून, येत्या 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्यमहाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय..
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या काळात प्रामुख्याने दुपारनंतर वातावरणात मोठे बदल होऊन वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल
विशेषतः अठरा ते वीस मार्च दरम्यान या नैसर्गिक घडामोडींची तीव्रता वाढणार असून काही भागात गारपीटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे
धाराशिव जिल्ह्यात मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या पुढाकारातून १४ वर्षे पूर्ण परंतु १५ वर्षे पूर्ण नसलेल्या मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम ८ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे.भविष्यात गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळावे हा या मोहिमेचा उद्देश असून ही लस जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध करण्यात आली आहे.पात्र मुलींनी वेळेत ही लस घेऊन या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
गुढीपाडवा ते मृग नक्षत्र दरम्यान दररोज करण्यात येणाऱ्या विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजेची नोंदणी फूल्ल झाली आहे.
मंदिर समितीने 13 मार्चपर्यंत भाविकांना पूजेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार राज्यभरातील भाविकांनी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चंदन ओटी पूजेची ऑनलाईन नोंदणी केली. अवघ्या दोनच दिवसांमध्ये पूजेची नोंदणी फुल्ल झाली आहे.
ग्रीष्म ऋतू मध्ये विठुरायाला शितलता मिळावी यासाठी गुढीपाडव्यापासून ते मृग नक्षत्रापर्यंत दररोज सायंकाळी चार वाजता चंदन उटी पूजा केली जाते. यासाठी दररोज एक ते दीड किलो चंदन उगाळून त्याचा लेप देवाच्या सर्वांगाला लावला जातो.
विठुरायाच्या चंदन उटी पूजेसाठी 21 हजार रुपये तर रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 9 हजार रुपये देणगी शुल्क आकारण्यात आले आहे. यादरम्यान विठ्ठलाच्या 48 तर रूक्मिणी मातेच्या 46 पूजा होणार असून यातून मंदिर समितीला 14 लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
पुणे परिमंडळात महावितरणची मोठी थकबाकी
३१९ कोटी रुपये वीजबील थकल
ग्राहकांना वीजबील भरण्याचं आवाहन
आता पर्यंत ७ हजार १२२ ग्राहकांचा वीज पुरवठा केला खंडित
वीजबील भरा अन्यथा आम्ही वीज कनेक्शन बंद करण्याचा इशारा
अमरावती ठरले देशात सर्वाधिक उष्ण शहर,शुक्रवारी तब्बल 41.8 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद
सलग दुसऱ्या दिवशी अमरावतीत सर्वाधिक तापमानाची नोंद, विदर्भातील सहा शहरांचे तापमान 40 अंशांच्या वर
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याचे आग ओकने सुरू झाले असून दिवसाचा पारा झपाट्याने वर गेला आहे
ज्यामुळे विदर्भातील काही शहरांना उष्ण लाटेचा सामना करावा लागत आहे
गुरुवारी अमरावती येथे पारा सरासरीपेक्षा 6.8 अंशाने वाढून 42.2 अंशांवर पोहचला होता
त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी अमरावतीत देशातील 41.8 अंश सेल्सियस सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली
याशिवाय अकोला येथे 41.5, यवतमाळ 40.4, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी 41.4, नागपूर 39.4 अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले
पश्चिम विदर्भातील शहरांमध्ये दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे
नागपुरात समोसे आणि तरी पोह्याच्या किमती वाढणार
अमेरिका इस्त्रायल विरुद्ध इराण युद्ध आणि त्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेले व्यावसायिक गॅस तुटवडामुळे हॉटेल व्यवसायिक अडचणीत आहेत.. आर्थिक ताळमेळ बसवताना प्रचंड अडचणी येत आहे
यांमुळे काही हॉटेल व्यवसायिकांनी समोसे आणि तर्री पोहा यांच्या किमती वाढवल्या आहेत... नागपुरातील समोसा उद्यापासून 35 रुपये प्लेट ऐवजी40 रुपये प्लेटने (दोन समोसे ), तर तर्ररी पोह्याच्या किमतीत पाच रुपये प्लेटने वाढणार... पोहे 35 रुपये प्लेट ऐवजी चाळीस रुपये किमतीने मिळणार
आखाती देशातील युद्धाचा गैरफायदा घेत भंडाऱ्यात गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात येत आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरचा वापर करून भंडाऱ्यात काही व्यावसायिक व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या होत्या. भंडारा जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या नेतृत्वात सलग दुसऱ्या दिवशी भंडाऱ्यात छापेमारी करण्यात आल्या. या कोष्टी भोजनालय, भाऊची खानावळ आणि मोठा बाजार येथील दामोधर हॉटेल इथं छापा टाकून घरगुती वापराचे ८ सिलेंडर जप्त करण्यात आले. पुरवठा विभागांना सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी करीत आतापर्यंत ४५ सिलिंडर जप्त करून व्यवसायासाठी घरगुती सिलेंडरचा वापर करणाऱ्या विरोधात कारवाई केली आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात गॅस सिलेंडर उपलब्ध असून नागरिकांनी पॅनिक होऊ नये, असं आवाहन जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी केलं आहे.
पश्चिम विदर्भात पाणी प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे..
पश्चिम विदर्भातील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा अप्पर वर्धा धरणात सध्या 57% जलसाठा आहे..
पश्चिम विदर्भात एकूण 288 प्रकल्प आहेत..
यामध्ये 9 मोठे, 7 मध्यम आणि 272 लघु प्रकल्प आहेत..
सर्वात कमी जलसाठा बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात आहे. 34% सध्या जलसाठा खडकपूर्णा प्रकल्पात शिल्लक आहे..
त्यामुळे येत्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे..
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात शाळेच्या अधिकृत वेळेत हजेरी दाखवून विद्यार्थी चक्क खासगी शिकवणीला (ट्यूशन) जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी आता संपूर्ण जिल्ह्यातील शाळांच्या तपासणीचे आदेश दिले असून, या प्रकाराला थेट मुख्याध्यापकांनाच जबाबदार धरले जाणार
वाशिमच्या हिंगणवाडी येथे विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीच्या घटनेतून 6 एकर गहू आगीत जळून खाक झाला आहे.. पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्यात वीज वितरण च्या हलगर्जीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचं बघायला मिळालं. वाशिम जिल्ह्यातील ही तिसरी घटना असून तिन्ही घटनेत वेगवेगळ्या ठिकाणी गहू जळून खाक झाला आहे. यात शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नुकसान झालं.
यवतमाळ शहरातील उमरसरा भागात तीन फोटो मागे असलेल्या गल्लीत एका युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला भर वस्तीत ही थरकाप उडविणारी घटना रात्री दरम्यान घडली या प्रकरणात पोलिसांना तिघांवर संशय असून त्यांचा शोध घेतला जात आहे खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे सुद्धा स्पष्ट झालेले नाही अमोल खडसे राहणार पाठीपुरा असे मृतकाचे नाव आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची लवकरच सुटका होणार आहे. या दोन्ही ठिकाणच्या बायपासचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी युदधपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कामात येणारा कोकण रेल्वेचा अडथळा लवकरच दूर हाईल आणि 1 जून पर्यंत दोन्ही बायपास सुरू होतील अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. तटकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून कोकण रेल्वेच्या वरीष्ठ अधिकारयांशी चर्चा केली. कोकण रेल्वेच्या विद्युत पोलमुळे बायपासच्या कामांमध्ये अडथळे येत आहेत. हे अडथळे लवकरच दूर केले जातील असे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.