सातपुड्यातील दुर्गम भागातील प्रसिद्ध गावरान आंब्याला यंदा बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातपुडा पट्ट्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.हवामानातील या बदलामुळे आंब्याच्या झाडांवर करपा आणि भुरी सारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा थेट परिणाम आंब्याच्या मोहोरावर होत असून, मोठ्या प्रमाणावर मोहर गळती सुरू झाली आहे. प्रामुख्याने धडगाव, मोलगी आणि अक्कलकुवा या भागात बागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरातील बेकायदेशीर हालचालींवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री कोंम्बिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत ४१ इमारतींची झडती घेण्यात आली; तर शेकडो महिला-पुरुषांची तपासणी करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन बांगलादेशी महिला आणि काही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले आहे. तर, अमली पदार्थासह एकाला अटक करण्यात आली.
शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात अवैध धंदे सुरू असून, काही बांगलादेशी महिला आणि अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती
दोन बांगलादेशी महिला ताब्यात
नाकाबंदीदरम्यान, रामेश्वर बिभीषण बिराजदार (वय ३१, रा. बाजीराव रस्ता; मूळ रा. तांबरवाडी, ता. औसा, जि. लातूर) याच्या ताब्यातून सात ग्रॅम चरस आणि तीन इंजेक्शन जप्त करण्यात आले. तसेच, दोन संशयित बांगलादेशी महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज नवी मुंबईत जनता दरबारचा आयोजन
नवी मुंबई महानगरपालिका सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा गणेश नाईकांचा जनता दरबार
नवी मुंबईमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून जनता दरबारचा आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे
या जनता दरबारला भाजपचे नगरसेवक सिडको अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत
गडचिरोली, मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी दूरदृश्यप्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत शासनाने निश्चित केलेल्या वित्तीय मर्यादेपेक्षा अधिक निधीची मागणी राज्यस्तरीय पातळीवर करण्यात आली.
जळगाव देशातील सुमारे २७ लाख वीज कर्मचारी व अभियंते गुरुवारी देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत. कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करणार असल्याने वीज सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. प्रस्तावित विद्युत कायदा २०२५, वीज क्षेत्राचे खासगीकरण, स्मार्ट प्रीपेड मीटर आणि आउटसोर्सिंग धोरणाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. प्रमुख १० ट्रेड युनियन, स्वतंत्र फेडरेशन, संयुक्त किसान मोर्चा व वीज क्षेत्रातील संघटना आंदोलनात सहभागी होणार आहे. महाराष्ट्रात वीज कामगारद्वार सभा, निदर्शने आणि काळ्या फिती लावून संपास पाठिंबा देणार आहे. यात जळगावातील कर्मचारीदेखील सहभागी होणार आहे. ग्राहक सेवेत अडथळा येऊ नये असे, आवाहन संघटनांनी केले आहे. जुनी पेन्शन योजना व नियमित नोकऱ्यांसह विविध मागण्या यावेळी मांडल्या जाणार आहे.
बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायपूर गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे.. यापूर्वी गावात पाण्यासाठी महाजल तसेच जलजीवन सह विविध योजनेद्वारे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला.. मात्र प्रत्यक्षात, नियमित गावाला नियमित पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थ महिलांनी केली आहे.. दोन महिन्यानंतर पाणी मिळत असल्याचे सांगत आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी शेकडो महिला जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंतांच्या दालनात धडकल्या.. ग्रामीण पाणी पुरवठा अभियंत्यांसमोर महिलांनी आपली कैफियत मांडली आणि नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केलीय ...
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब जिल्हा परिषद गटातून जायंट किलर ठरलेल्या प्रमोद अधटराव जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत
इथं शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचा पराभव केलेल्या प्रमोद अधटराव यांना भाजपकडून मिळणार उपाध्यक्ष पदाचं गिफ्ट
कोसुंब गटात भाजप विरुद्ध शिवसेना अशी होती लढत, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला ४ जागांवर मिळालाय विजय
शिंदे शिवसेना आणि भाजपची जिल्ह्याच युती असल्याने भाजपची जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची मागणी
परभणी महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी निवड आज होणार आहे. असे असताना काल रात्री काँग्रेसचे आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्या मध्ये बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत स्थानिक पातळीवर 2 नेत्याने एकत्र राहण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे चा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर होणार हे निश्चित झाले आहे त्यामुळे शिवसेनेच्या या 6 नगरसेवकमधून महापौर निवडला जाईल.तर काँग्रेसच्या 3 नगरसेवकमधून उपमहापौर निवडला जाईल
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमान स्थिर असून कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे त्यामुळे सकाळी आणि रात्री काहीसा गारवा असला तरी दुपारी उन्हाचा कडाका जाणवत आहे पुढील दोन दिवस हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नसून उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
नवनियुक्त महापौर मंजुषा नागपूर यांनी आपल्या पहिल्याच पत्रात पालिका प्रशासनाला इशारा देऊन शहरातील प्रमुख नाले पावसाचे पाणी वाहून येणाऱ्या वाहिन्यांची साफसफाई 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य असून यामध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याची तंबीकली आहे याशिवाय नदी सुधार प्रकल्पाची सद्यस्थिती आणि पावसाळ्यातील सुरक्षिततेबाबत सविस्तर अहवाल तीन दिवसात सादर करावा असा आदेशही दिला आहे.
एमसीए हॉटेल मॅनेजमेंट साठी 18 फेब्रुवारीपर्यंत मुदत...
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष 2026 27 साठी घेण्यात येणाऱ्या एमसीए आणि एमएचएमसीटी या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश नोंदणीस 18 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुण्यातील नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी नाचवल्या तलवारी? भाजप युवा मोर्चाकडून कार्यक्रमाला आक्षेप
सुदान च्या विद्यार्थ्यांचा सादरीकरणाला विरोध
पुण्यातील नामांकित महाविद्यालयात वर्ल्ड कल्चर फेस्टीव्हल
तसेच बांगलादेश च्या विद्यार्थ्यांनी लावलेला स्टॉल भाजप युवा मोर्चा ने लावला उधळून
पुण्यात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात स्टॉल आणि सादरीकरण
पुणे शहराच्या भाजप युवा मोर्चाकडून निषेध व्यक्त
भाजप युवा मोर्चाकडून कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार
भंडारा जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे नवजात बालिकेची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन वरठी पोलिसांनी पाच आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यात डॉ नितेश वाजपेयी बालाजी क्लिनिक रामनगर गोंदिया समावेश आहे.२ फेब्रुवारी २०२६ रोजी महिला व बाल विकास विभागाच्या 'चाइल्ड हेल्पलाइन'वर माहिती मिळाली की, पांढराबोडी येथील मालती प्रकाश वाघमारे (वय ४४) या महिलेने १० दिवसांची नवजात बालिका बेकायदेशीररित्या घरी आणली आहे.
प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल गुलाबाला परदेशी नागरिकांची भुरळ पडलेली आहे. त्यामुळे परदेशात मोठ्या प्रमाणावर मावळतील गुलाबाला मागणी वाढली आहे. सध्या मावळात गुलाब फुले परदेशात पाठवण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी परदेशात मोठी मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिले आहे..
अबरार शेख याला मनपा निवडणुकीच्या वेळेस किरकोळ कारणातून मारहाण करण्यात आली होती त्यावेळी अबरार शेख याने पोलिसांमध्ये तक्रार केली होती याचा राग मनात धरून अबरार शेख यांच्यावर रात्री अकराच्या सुमारास चार गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती..
आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी शेतकरी कर्ज निवारण योजना लागू केली जाणार आहे,या दृष्टीने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्जदार शेतकऱ्यांची माहिती घेतली जात असून याच वेळी राष्ट्रीयकृत बँकांकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची कुठलीच माहिती अद्याप गोळा झालेली नाहीत, यामुळे शेतकरी कर्ज निवारण योजना लागू झाली तर याचा लाभ जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार काय असा प्रश्न विचारला जाताहेत यातून राष्ट्रीयकृत बँकांमधील शेतकरी संभ्रमात सापडले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.