मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला. नव्या वर्षात आमरण उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच नव्या वर्षात ते कधी आमरण उपोषणाला बसणार? सरकारकडून त्यांच्या कोणत्या मागण्या आहेत? याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा, मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाचा हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे पाटील येणाऱ्या २५ जानेवारीपासून अतंरवाली सराटीमध्ये सामूहिक आमरण उपोषण करणार आहेत. यापुर्वी त्यांनी सहावेळेस मराठी आरक्षणासाठी उपोषण केलं. मात्र, नवं सरकार स्थापन झाल्यानंतर ते सातव्यांदा आमरण उपोषणाला बसणार आहेत.
मराठा आंदोलक जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांचे निवेदन उद्या जालना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नवीन सरकारला देणार आहेत. त्या मागण्या नक्की कोणत्या?
१. सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
२. राज्य सरकारने मुंबई, सातारा आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी.
३. सगे-सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी.
४. ८३ क्रमांकाला मराठा कुणबी एक आहे, त्यामुळे कायदा लागू करावा. १८८१ पासून मराठा समाज आरक्षणात आहे.
५. सरकारने सांगितल्याप्रमाणे मराठा समाजातील तरूणांवरील गुन्हे मागे घ्यावेत.
६. शिंदे समितीचे काम बंद आहे, त्यांना नोंदी शोधण्यासाठी काम करायला लावा. एक वर्षाची मुदतवाढ त्यांना देण्यात यावी. कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश सरकारने द्यावे.
७. मराठा समाजाचे EWS आरक्षण बंद केले आहे. ते पुन्हा लागू करावे, यासह कुणबी एसीबीसी असे ३ पर्याय देण्यात यावे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आंदोलनाची तारीख जाहीर केली. २५ जानेवारी २०२५ पासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. हे सामूहिक आमरण उपोषण असेल असं त्यांनी सांगितलं. ज्यांना बसायचं आहे, ते आमरण उपोषणाला बसू शकतात. कुणावरी जबरदस्ती नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.