आम्ही राज्य सरकारवरही समाधानी नाही. सरकार काय करत होते, याबाबतही आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तुमचे निदर्शक या न्यायालयाच्या न्यायाधीशांना रस्त्यावरून चालत त्यांच्या न्यायालयात पोहोचण्यासाठी आणि कामकाज चालवण्यास कसे भाग पाडू शकतात? तुमचे निदर्शक रस्त्यावर नाचत होते म्हणून तुम्ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना असे चालण्यास भाग पाडू शकत नाही. उल्लेखनीय म्हणजे, न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांना काल उच्च न्यायालयाकडे चालत जावे लागले, जेव्हा त्यांनी त्याच प्रकरणात विशेष सुनावणी घेतली.
कोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारने काय पावलं उचलली ? तुम्ही अनाउन्सम्ंट केल्या का ? मुंबई विमानतळापासून ते मुख्य शहरापर्यंत रस्त्यांवर गर्दी आहे… जाम आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व रिकमं करा. त्यासाठी तुम्ही आतापर्यंत काय पावले उचलली, पुढे काय पावले उचलणार आहात? याबाबतचा सवाल कोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे.
आज दुपारी ३ वाजेपर्यंत जागा खाली करा आणि आम्हाला कळवा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून काम करु, असा गंभीर इशारा कोर्टाने दिला आहे. कोर्टात जे सादर केलेलं आहे ते आम्ही पाहिलं, जे धक्कादायक आहे. यामुळे लोक घराबाहेर पडत नाहीत, असे न्यायमूर्ती म्हणाले.
हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामी करावी. आंदोलन पूर्णपणे बेकायदा आहे. मुंबईतील परिस्थिती सहन करण्यासारखं नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.
कोर्टाकडून राज्य सरकारला ३ वाजेपर्यंतचा वेळ
मुंबईतील आंदोलकांवर काय कारवाई केली? यापुढे तूम्ही काय कऱणार आहात? राज्य सरकारने कोणती चर्चा केली? काय निर्णय घेतला आहे? असा सवाल कोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. राज्य सरकारला यासाठी तीन वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. तीन वाजेपर्यंत कोणती कारवाई केला जातेय? त्याचा पूर्ण आढावा आम्हाला द्या, असा आदेश कोर्टाने दिला आहे.
हे फारच गंभीर आहे. राज्य सरकारकडून देखील काही त्रुटी झाल्या का ? मुंबईत जी परिस्थिती निर्माण झाली ती सहन करण्यासारखी नाही. आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामी करावी, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, असे कोर्टाने ठणकावले.
मुंबईमधील आझाद मैदानात फक्त ५ हजार आंदोलक असायला हवेत. ५० हजार किंवा एक लाख आंदोलक असू नये. आंदोलनात फक्त ५ हजार जण असतील, अशी प्रेस नोट काढली आहे, असा सवाल कोर्टाने विचारला.
मराठा आरक्षणाबाबत कोर्टात सुनावणीला सुरूवात झाली आहे. मराठी आंदोलकांच्या वतीने ॲड सतीश माने शिंदे बाजू मांडत आहेत. काही लोकांकडून त्रास होत आहे. त्यासाठी आम्ही माफी मागतो, असे म्हणाले. काहींमुळे त्रास होत असेल तर माफी मागतो.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानावरती आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान जालन्यातील धनगर पिंपरी गावातील शेकडो मराठा बांधव भाजी भाकरी घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. जवळपास दहा क्विंटलच्या भाकरी घेऊन हे मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेत. शासनाला केव्हा जाग येईल माहित नाही मात्र आमचे बांधव मुंबई येथे उपाशी राहू नये म्हणून आम्ही गावातून भाजी भाकरी घेऊन मुंबईकडे जात असल्याची प्रतिक्रिया मराठा बांधवांनी दिली आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी...
नगर - मनमाड महामार्गावर एक तास रास्ता रोको...
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देत मराठा बांधव उतरले रस्त्यावर...
आरक्षणाच्या मागणीसाठी
राहुरी कृषी बाजार समीतीसमोर विविध पक्ष आणि संघटनेचे कार्यकर्ते तसेच नागरीकांचा रास्ता रोको...
प्रशासनाला मागणीचे निवेदन देत आंदोलन मागे...
एक तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी...
पुण्यात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण
स्वारगेट चौकात केला जात आहे लाक्षणिक उपोषण
मुंबईत मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरू आहे
पुण्यात अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर वतीने आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी एक दिवस लाक्षणिक उपोषण केले जात आहे
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचा विकास निधी मोर्शी मतदारसंघात वळवल्याचे प्रकरण....
चांदूरबाजार पोलिसात तक्रार प्रहारच्या चौघां विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल...
अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांची बदनामी करण्यासाठी बनावट दस्तावेज बनवल्याचा आरोप...
बनावट दस्तावेज तयार करून ते प्रिंट मीडिया व सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा ठपका ठेवत प्रहारच्या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल..
प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला होता आमदार प्रवीण तायडे यांच्यावर निधी वळवण्याचा आरोप..
तर आमदार प्रवीण तायडे यांनी ही केला होता बच्चू कडू यांच्यावर निधी वळवण्याचा आरोप...
सध्या अचलपूर मतदार संघात भाजप आणि प्रहार निधी वळवणावरून आमने-सामने..
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आज नांदेडच्या नायगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.सकाळपासून व्यापाऱ्यांनी शहरातील सर्व प्रतिष्ठान बंद ठेवली आहेत.मराठा समाज बांधवांच्या वतीने रस्त्यावर उतरून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी देखील करण्यात आलीय.मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी यावेळी मराठा बांधवांनी केली आहे.जरांगे पाटलांची तब्येत खालावली आहे. सरकार दखल घेत नाही.त्यामुळे मराठा आंदोलकांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटील यांना नांदेड जिल्ह्यातून मोठा पाठिंबा मिळत आहे.नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातून आज शेकडो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईमध्ये अन्नपाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून सोबत पाच हजार भाकरी आणि चटणी सोबत घेऊन हे मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.नांदेड जिल्ह्यातील इतर तालुक्यातून देखील मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय माघार फिरणार नाही असा निर्धार या मराठा बांधवांनी केला आहे.
- मराठा बांधव मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात
- मुंबईतील मराठा आंदोलनात समाजकंटक घुसवून आंदोलनाला बदनाम केलं जातंय, राज्यपालांनी याची चौकशी करावी
- मराठा बांधवांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- तर ओबीसी बांधव ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण नको, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात
- ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी भुजबळ समर्थक ओबीसी बांधवांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मनोज जरांगे यांच्या समर्थनात आंदोलन...
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात रास्तारोको आंदोलन...
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह मराठा बांधव आंदोलनात सहभागी...
हातात भगवे झेंडे आणि डोक्यावर भगव्या टोप्या घालून आंदोलक रस्त्यावर...
आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरची वाहतूक ठप्प...
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात...
वाशी रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त
कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सिडको एक्जीबिशन मध्ये मराठा बांधवांचा वास्तव
मराठा बांधवांनी ट्रेन रोकू नये किंवा रुळावर खाली जाऊ नये याच दृष्टीने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे
बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय. ज्या आंदोलनामध्ये पाच लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झाले आहे. त्या गुन्ह्यांची प्रकरणे मागे घेतली जाणार आहेत. बीड जिल्ह्यात या गुन्ह्यांबाबत आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सर्व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल आमच्या मनात कटुता नाही, त्यांनी फक्त आमच्या मागण्या मान्य कराव्यात- मनोज जरांगे पाटील
सरकारला नासकी सवय लागली आहे. उल्लंघन केले नाही केले, तरी तसेच म्हणायचे. इथे पाच हजार लोकं आहे. इथे बसू नका म्हणाल्यावर ते कुठे थांबणार.. ते थोडं इकडे तिकडे फिरणारच.. तुम्ही ज्या जागेवर सांगितलं, त्या जागेवर लोकं आहे. रस्त्यावर गाड्या नाहीत. सीएसएमटी, बीएमसी रिकामी केली. कोणतं उल्लंघन केलेय. फडणवीस यांनी अन्यायकारक वागू नये. न्यायदेवतेला खोटी माहिती देतो, म्हणून हे होतेय. फडणवीस खोटारडा, कुटील डाव खेळायला लागला. कोर्टात खोटी माहिती देऊन फडणवीस आमच्यावर मराठ्यावर अन्याय करतो, दुष्परिणाम फडणवीसांना भोगावे लागतील. आम्ही काहीच करत नाही.
मेलो तर आझाद मैदानातून हटणार नाही. काय व्हायचे ते होऊ दे. त्याचे दुष्परीणाम ते जाणो अन् मराठे जाणो.
कुठल्याही स्तराला गेला तर मी कोणत्याही टोकाला जायला तयार. पण मी मागण्या अंबलबाजवणी घेतल्याशिवाय हटणार नाही. मराठे काय असतात हे ३५० वर्षानंतर पुन्हा पाहायचे असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. मी मरोपर्यंत हटणार नाही.
मराठ्यांना शेवटचे सांगतो. गाड्या पार्गिंकला लावा. मैदानात लावा.. रेल्वे, एसटीने प्रवास करा.. कुठे लावू देत नसेल तर वाशीला लावा अन् रेल्वेने या.. माझी तब्येत कितीही खराब झाली तरी शांतच राहायचे, वेड्यासारखे करायचे नाही. तुम्हाला माझी मया आहे, मला तुमची मया आहे. कितीही त्रास झाला तरी शांत राहायचे. मी मेल्याच्या नंतरही तुम्ही शांत राहा.. त्यानंतर तुम्ही काय करायचे ते करा.. पण माझं म्हणणं आहे, ही लढाई शांततेत लढायची अन् जिंकायची. मी मरेपर्यंत हटणार नाही, हे देवेंद्र फडणवीस यांना ठासून सांगतोय. फक्त कारणं करू नका. कोर्टाच्या नियमाचे पोरांनी पालन करावे. न्यायदेवता आपल्यासाठी आहे, आपला आधार आहे. कोर्टाकडून आपल्याला परवानगी मिळेल, आपल्या बाजूने उभे राहील. आपल्या वेदनेत सहभागी होईल, आपल्यावर अन्याय करणार नाही.
तुम्ही ज्याच्या जिवावर बोलता, त्यापेक्षा आमची संख्या साडे नऊ पट जास्त आहे. जिकडे नाही घुसायचे तिकडे घुसू नका. उगीच मुंबईतून हाकलून देऊ, हे थांबवा. गोर गरीबांना न्याय कसा द्यायचा ते काम करा.
मराठ्यांना इथून काढून देणं, ही काळजात रूतणारी सल आहे. तुम्ही काहीही निमित्त काढून आझाद मैदानातून उसकवून देतात. हे तुम्हाला महागात पडेल. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावाल, लाठीचार्ज करायला लावाल तर तेही तुमच्यासाठी हे अति घातक असेल. भविष्यात तुम्हाला खूप मोठा धाक असेल. तुमच्याही लोकांना महाराष्ट्रात यायचेय.
आम्ही मुंबईत आलो म्हणून मारहाण करायला लावली. तुमच्यानेत्यांना महाराष्ट्रात यायचेय. हे लक्षात ठेवा. आम्ही आणखी शांत आहे. शांततेत मार्ग काढून मराठ्यांचा प्रश्न सोडून सन्मान करा. त्यांना पोलिसांच्या हातून अपमान करून त्यांचा अपमान करू नका. त्यांचा सन्मान केला तर हे गरीब लोकं तुम्हाला कधी विसरणार नाहीत. पण अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घेण्याची चीड होईल. त्यामुळे गोडीत करा.
तुम्ही कितीही आम्हाला भीती दाखवा आम्ही भीत नाही
आम्ही शांत आहोत, शांत राहू द्या
आणखी मराठे येणार आहेत
शनिवरी रविवारी मराठे येणार आहेत
आम्ही आजपासून नाही तर २२ वर्षांपासून कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालयाचे नियम पाळून आंदोलन करतोय
आम्ही शांततामय मार्गाने दोन वर्षांपासून आंदोलन करतोय
सिडको एक्जीबिशन मध्ये मराठा बांधवांचे राहण्याची व्यवस्था
हे दृश्य आहे सिडको एक्जीबिशन मधलं
क्षणभर विश्रांती घेण्यासाठी मराठा बांधव सिडको एक्जीबिशनमध्ये
दिवसभर मध्ये आझाद मैदानामध्ये हजेरी रात्री मुक्काम वाशी इथे
- आजपासून नागरिकांना रात्री उशिरापर्यंत गणपती देखावे पाहता येणार
- शेवटचे पाच दिवस गणपती देखावे रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्याची सार्वजनिक गणेश मंडळांची होती मागणी
- गर्दी होण्याच्या मार्गावर काही ठिकाणी वाहतुकीत देखील बदल
- गणेशोत्सवातील शेवटच्या पाच दिवसात देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचा अंदाज
अकलूज येथील गणेश भक्त रणवीर खडके यांनी आपल्या घरच्या गणपती समोर ऑपरेशन सिंदूरचा देखावा साकारला आहे. यातून भारतीय सैनिकांचा पराक्रम आणि त्यांचे शौर्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
पहलगाम हलल्यानंतर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवर हल्ला करून बदला घेतला होता. यंदा गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्या घरातच आॅफरेशन सिंदूरचा देखावा साकारला आहे. त्यांचा देखावा पाहण्यासाठी अकलूजकरांनी गर्दी केली आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात मराठा आंदोलकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून महत्वाच्या सूचना
सर्व मराठा बांधवांनी आपल्या मागण्या शांततेत तसेच लोकशाही पद्धतीने पूर्ण कराव्या
मराठा आंदोलकांनी वयोवृद्ध, दिव्यांग प्रवाशांसाठी अडचण होणार नाही त्रास होणार नाही याची दक्षता घेत मार्ग मोकळा करून द्यावा
आझाद मैदानाकडे जाण्यासाठी जाणाऱ्या भुयारी मार्गाचा वापर करावा
महिलांच्या डब्यातून तसेच राखीव डब्यातून मराठा बांधवांनी प्रवास करू नये अशा सूचना रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासन करण्यात येत आहे.
राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत सध्या 'बॅनर वॉर' रंगला आहे.. 'मी धावतो व्होटचोरी रोखण्यासाठी' या उपक्रमाअंतर्गत काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी लागलेले बॅनर याला कारणीभूत ठरले आहेत.. या बॅनरला प्रत्युत्तर देणारे बॅनर विरोधकांनी विशिष्ट शैलीत लावल्याने वाद निर्माण झाला.. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सकाळी हे बॅनर पाहताच संताप व्यक्त करून बॅनर फाडले .. परिणामी, प्रकरण फक्त बॅनरबाजीत मर्यादित न राहता थेट पोलिसांत गेले असून, काँग्रेस चे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह १४ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत
रस्त्याच्या झालेल्या दुरावास्थेवरून राजगड तालुक्यातील मनसे आक्रमक, खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत केले आंदोलन
चेलाडी ते राजगड पर्यंत 30 किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत केला निषेध व्यक्त
यावेळी निषेधाचे फलक हातात घेऊन, प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून राजगड रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालीय, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक तरुणांना आपले जीव गमवावे लागलेत.
वारंवार मागणी करूनही प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले
रस्त्यांची अवस्था बघून युनेस्कोने राजगड किल्ल्याला दिलेला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा काढून घेईल अशी संतापजनक प्रतिक्रिया देत मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
धाराशिव च्या उमरगा शहरात गौरी-महालक्ष्मी उत्सव मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा होत आहे.या पार्श्वभूमीवर शहरातील वेदपाठक कुटुंबियांच्या घरी यंदा विशेष आकर्षण ठरले आहे ते म्हणजे १२ ज्योतिर्लिंगांचा देखावा.हा देखावा पाहण्यासाठी महिलांसह भाविकांची मोठी गर्दी उसळली असून,प्रत्येकाने या अद्वितीय कलाकृतीचे कौतुक केले. गौरी-महालक्ष्मी उत्सवात दरवर्षी विविध प्रकारचे धार्मिक देखावे साकारले जातात.मात्र,या वर्षी वेदपाठक कुटुंबाने विशेष परिश्रम घेऊन १२ ज्योतिर्लिंगांची अप्रतिम प्रतिकृती तयार केली आहे. भाविकांना एकाच छताखाली भारतातील पवित्र १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची संधी मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या बनावट जात प्रमाणपत्र धारकांवर कारवाई करण्यात यावी, तसेच ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवावी, या मागणीसाठी डॉ. प्रवीण तायडे यांनी सिंदखेड राजा येथे उपोषण सुरू केले आहे .. डॉ तायडे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे .. ओबीसी समाजाला त्यांचे हक्क मिळावेत आणि या घुसखोरीला आळा बसावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी इतर समाजातील लोक बनावट जात प्रमाणपत्रांचा वापर करत आहेत.. यामुळे खऱ्या ओबीसी समाजातील पात्र विद्यार्थी आणि तरुणांचे हक्क हिरावले जात आहेत.. यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष वाढला आहे.. या उपोषणाद्वारे डॉ. तायडे यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे...
जळगाव, येथील सुवर्णबाजारात सोने, चांदीचा भावाला दर दिवसाआड झळाळी येत आहे. सोन्याच्या भावात एक हजार १०० रुपयांची (प्रतिदहा ग्रॅम), तर चांदीच्या तीन हजारांनी प्रतिकिलोमागे वाढ झाली. सोने, चांदीतील या उच्चाकांने गुंतवणूकदार हैराण झाले आहेत. अमेरिकेने आयात शुल्कात वाढ जाहीर केल्यानंतर सोने आणि चांदीच्या बाजारपेठेत मोठी वाढ सातत्याने होत आहे. या निर्णयामुळे गुंतवणुकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे वळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. परिणामी, या धातूंच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहेत. शनिवारी सोन्याचा भाव एक लाख तीन हजार ५०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम) विना जीएसटी होता. सोमवारी त्यात ११०० रुपयांची वाढ होऊन सोने एक लाख चार हजार ६०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम) विना जीएसटी आहे. चांदीचा शनिवारी एक लाख २१ हजार प्रतिकिलो विना जीएसटी भाव होता. सोमवारी चांदी एक लाख २४ हजार पोहोचली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषण आंदोलनस्थळी राज्य भरातून आंदोलक पोहचत असल्याने त्यांच्या जेवण्याची गैरसोय हेऊन नये या साठी नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील मराठा क्रांती मोर्चा तर्फ जमा करण्यात आला असून डाळी,तांदूळ,तेल कांदे बटाटे,पाणी बॉटल,बिस्किटपुडे यासह अन्य किराणा माल मुंबई येथे पाठविण्यात आला आहे.
मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला राज्यभरातून मोठा जनसमर्थन मिळत आहे.या लढ्याला पाठींबा देण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक देखील आपापल्या पद्धतीने सहभाग नोंदवत आहेत.मोहा येथील अमोल मडके यांच्या घरी गौरी-लक्ष्मीच्या देखाव्यामध्ये या आंदोलनाचे वास्तव चित्रण करण्यात आलय.विशेष म्हणजे, मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आरक्षण लढ्याचे प्रतिकात्मक दृश्य साकारून समाजभावना जागृत करण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आलाय.यात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील,त्यांना मिळणारे लोकसमर्थन, तळ ठोकून बसलेले आंदोलक, तसेच गावागावातून पाठिंबा दर्शविणारे नागरिक अशा दृश्यांचे हुबेहूब दर्शन घडविण्यात आले.
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद उत्सवानिमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीत डॉल्बी वापरण्यास पोलिसांनी केली बंदी
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठोपाठ पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी शहरात देखील डॉल्बी बंदीचे दिले आदेश
1 ते 7 सप्टेंबर पर्यंत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि ईद-ए-मिलाद कमिटी यांचेकडून आयोजीत मिरवणूकीमध्ये डॉल्वी सिस्टीमचा वापर करणेस बंदी
मागील काही दिवसापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डॉल्बीच्या वापरावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी सोलापूरकरांच्या वतीने करण्यात येतं होती
यासाठी विविध आंदोलन, मोर्चे, सह्याची मोहीम इत्यादी गोष्टी सोलापूरकरांनी केलेल्या होत्या
या सर्व चळवळीला आता यश आल असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डॉल्बीच्या वापरावर बंदी करण्यात आलीय
धाराशिव जिल्ह्यातील कळंब रोड रेल्वे स्टेशनवर दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड पंढरपूर एक्सप्रेस रेल्वेला थांबा मंजूर करण्यात आला आहे.रेल्वे प्रशासनाने या थांब्याला प्रायोगिक तत्त्वावर मान्यता दिली आहे अशी माहिती धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे.कळंब रोड रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाठपुरावा केला होता.या निर्णयामुळे कळंब तालुक्यातील प्रवाशांची दिर्घकाळीन मागणी अखेर पूर्ण झाली आहे.रेल्वे बोर्डाने ११ ऑगस्ट रोजी अधिकृत आदेश काढून ही मान्यता दिली आहे.लवकरच अंमलबजावणी होणार आहे या थांबल्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
आझाद मैदान आणि परिसरात स्वच्छता लवकरात लवकर व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.
या कामासाठी स्किड स्टिअर लोडर म्हणजेच बॅाबकॅटद्वारे स्वच्छता करण्यात येत आहे.
या यंत्राद्वारे थेट कॉम्पॅक्टर्समध्ये कचरा भरण्यात येत आहे. दोन मिनी कॉम्पॅक्टर्स आणि एक लार्ज कॉम्पॅक्टरचा यासाठी वापर केला जात आहे. लवकरात लवकर या परिसरात स्वच्छता करून परिस्थिती पूर्ववपदावर आणण्यासाठी महानगरपालिकेचे प्रयत्न आहेत.
आम्हाला झोपायला जागा नाही आमचा बाप झोपला नाही आम्ही झोपायचा कसा असावा मोर्चेकरी व्यक्त करत आहेत मुंबईतील रस्त्यांवर फूटपाथवर क्षणभर विश्रांती मोर्चेकरी घेत आहेत आजूबाजूला घाणीचे साम्राज्य निर्माण झालाय
बुधवारी मराठा आंदोलकर्ते ची सांख्य मुंबईत प्रचंड वाढताना दिसेल
आज गौरी गणपती चे विसर्जन होणार आहे.....
आज विसर्जनानंतर मराठा आंदोलकर्ते मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होणार ...
गावच्या गाव खाली होतील व जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी मुंबईत धडकतील ...
खासकरून महिला वर्ग मोठ्या प्रमाणत येण्याची शक्यता ...
मराठा आंदोलकर्ते मोठ्या संख्येने आपल्या गावातून निघणार.
- मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आंदोलकांनी केली गर्दी
- भेटण्यासाठी लावलीये रांग
- आझाद मैदान परिसरात सकाळच्या सुमारास आंदोलकांची मोठी गर्दी
हिंगोली जिल्ह्यात मागील महिनाभरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार 58 हजार हेक्टर वरील सोयाबीन ,कापूस पिकांचे नुकसान झाले आहे तर हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या हळदीला देखील अतिवृष्टीने मोठी बाधा झाली आहे आतापर्यंत जिल्ह्यात 40 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची दुधाळ व शेतकामं करणारी जनावरे वाहून गेली आहेत यामध्ये एका शेतकऱ्यांसह इतर दोन दोघांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला आहे.
रस्त्याच्या झालेल्या दुरावास्थेवरून राजगड तालुक्यातील मनसे आक्रमक, खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत केले आंदोलन
चेलाडी ते राजगड पर्यंत 30 किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत केला निषेध व्यक्त
यावेळी निषेधाचे फलक हातात घेऊन, प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून राजगड रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालीय, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक तरुणांना आपले जीव गमवावे लागलेत.
वारंवार मागणी करूनही प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले
रस्त्यांची अवस्था बघून युनेस्कोने राजगड किल्ल्याला दिलेला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा काढून घेईल अशी संतापजनक प्रतिक्रिया देत मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
जून, जुलै, ऑगस्ट तीन महिन्यांत ५३२.४ मिलिमीटर पाऊस
पुणे शहरात पावसाला सलग दुसऱ्या महिन्यात,ऑगस्ट महिन्याची सरासरी गाठता आली नाही.
गेल्या आठवड्यात शहरात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असली, तरी महिनाभरातील इतर दिवस पावसाने विश्रांती घेतली.
त्यामुळे सरासरीपेक्षा १० मिलिमीटर कमी १३६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुणे शहरात जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत ५३२.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
मे महिन्यापासूनच यंदा जिल्ह्यात, धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी वर्ग खूश असला, तरी शहरात मात्र जून वगळता जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण घटले आहे. पुण्यात जूनमध्ये
ऑगस्ट महिन्यात पहिले १० दिवस पावसाने ओढ दिली होती. तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. ऊन, अधूनमधून ढगाळ वातावरण, विश्रांतीनंतर बरसणाऱ्या हलक्या सरी असे चित्र
आज आणि उद्या दोन दिवस शहरात आकाश दिवसभर ढगाळ राहणार आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात हलक्या सरींची आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.
अग्निशमन दलाकडून नायडू, येरवडा, खराडी व अग्निशमन मुख्यालय येथील वाहने दाखल होत जवानांनी बोटीच्या साह्याने शोधकार्य घेत होते.
काल दुपारी साडेचार वाजता सदर मृतदेह मुंढवा पुलानजीक दिसून येताच पाण्याबाहेर काढला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
ताडीवाला रोड उल्हासनगर पुणे या ठिकाणी मुळा मुठा नदी ताडीवाला रोड नदीपात्रात राहुल सूर्यकांत हावडे वय वर्ष अंदाजे 24 ही व्यक्ती सदर पोहण्यासाठी गेली असता नदी पत्रा मध्ये बुडाली होती
खल झाल्या नदीपात्रामध्ये बोटीच्या साह्याने शोध घेत असताना तीन दिवसानंतर मृतदेह आढळून आला.
याचा अधिक तपास पोलीस करत आहेत
मागील थकित एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली नसल्यास परवाना मिळणार नाही,
साखर आयुक्तालयाकडून स्पष्ट निर्देश
राज्यातील साखर कारखान्यांकडे कोट्यावधी रुपयांची थकीत एफआरपी.
त्यामुळे आता नव्याने साखर कारखाने सुरू करताना थकीत रक्कम असेल तर परवाना दिला जाणार नाही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.