मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य, महायुतीतील अंतर्गत कुरघोडीच्या चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय.. शिंदेंनी दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेतलीय... तर इथे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत राज्यपालांची भेट घेतलीय.. त्यानंतर अजित पवारांनीही फडणवीसांसोबत चर्चा केलीय..अचानकपणे या भेटीगाठी वाढल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कविर्तक सुरू झाले आहेत.
फडणवीस वादग्रस्त मंत्र्यांना नारळ देण्याच्या विचारात
महायुतीतील वादामुळे शिंदे आणि अजित पवार अस्वस्थ
मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे शिंदेंची डोकेदुखी
धसांकडून मुंडेंवर आरोप केल्याने दादांनी भेट घेतल्याची चर्चा
पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणीवर रणनीती ठरवण्यासाठी बैठका
खरंतर नियोजित कार्यक्रम नसतानाही शिंदेंनी 2 दिवस दिल्लीत ठाण मांडलंय... यावेळी शिंदेंनी आधी भाजप नेते आणि त्यानंतर खासदारांसोबत बैठक घेतलीय... त्यामुळे खासदारांच्या बैठकीसोबतचं दिल्लीवारीचं खरं औचित्य नेमकं काय? असा सवाल विचारला जातोय..या प्रश्नाला शिंदेंनी मात्र बगल दिलीय.
या बैठकांचा सिलसिला महायुतीतील वादग्रस्त मंत्र्यांना नारळ देण्यासंदर्भात आहे का? हे दबाव तंत्र आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भात होणाऱ्या सुनावणीनंतर विरोधात निर्णय आल्यास नेमकी काय रणनीती आखायची? यावर आहे, असे अनेक प्रश्न निर्माण झालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.