आयएमडीनं मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातील काही भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला.
पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता.
अतिवृष्टीमुळे पूरस्थिती व वाहतूक कोंडी होण्याचा धोका.
नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि प्रशासनाच्या सूचना पाळण्याचं आवाहन.
दोन-तीन दिवसापूर्वी राज्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. मुंबई शहरासह उपनगरात आणि नांदेडमध्ये पावसाने थैमान घातलं होतं. आता हवामान खात्यानं पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिलाय. पुढील २४ तासांमध्ये राज्यातील काही भागांत अतिमुसळधार पाऊस होईल असा इशारा, हवामान विभागाने दिलाय. तर मुंबई शहरासह उपनगरात काय स्थिती असणार हे जाणून घेऊ.
रविवारी २४ ऑगस्ट रोजी पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड तसेच नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस होईल असा अंदाज आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसानं उघडीप दिलीय. त्याआधी मात्र पावसाने हाहाकार माजवला होता. अनेक भागांत अतिवृष्टीचा फटका बसला होता. शेतातील पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची घोषणा केलीय. दरम्यान राज्यावर अजूनही मुसळधार पावसाचं संकट घोंघावत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज वर्तवताना मुसळधार पाऊस होईल ,असा इशारा दिलाय.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर कोकणातील रायगड आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूरसह नांदेड मध्ये आज पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय. या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय. हा कमी दाबाचा पट्टा राजस्थान आणि पंजाबच्या परिसरात सक्रिय असणार अशून त्याचा परिणाम राज्यात जाणवणार आहे. येत्या २५ ऑगस्टपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या २५ ते २८ ऑगस्टदरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील पाच दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिमुसळधार होईल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. पुढील २४ तासांमध्ये रायगड, सातारा, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर २६ आणि २७ ऑगस्ट रोजी काही मुंबई आणि ठाण्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल. उद्या आणि परवा म्हणजेच २४ आणि २५ ऑगस्ट रोजी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.