Maharashtra Rain Saam tv
महाराष्ट्र

Rain Alert : शुक्रवारी कोणत्या जिल्ह्याला पावसाचा इशारा? IMD ने ५ दिवसांचा अंदाज सांगितला; विकेंडला पाऊस कोसळणार का?

Maharashtra Weather Update: हवामान विभागाने २३ ते २७ जुलैपर्यंतचा महाराष्ट्राचा जिल्हानिहाय पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. रेड अलर्ट हटवण्यात आला असून कोकण, पुणे आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज व काही जिल्ह्यांत यलो अलर्ट कायम आहे. पु

Namdeo Kumbhar

Maharashtra weather forecast next five days : राज्यात सलग काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसानंतर आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा (२३ जुलै ते २७ जुलै २०२६) जिल्हास्तरीय अंदाज आणि इशारा जारी केला आहे. २७ तारखेपर्यंत कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट दिलेला नाही.

राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होत असून रेड अलर्ट पूर्णपणे हटवण्यात आला आहे. मात्र, धोका अद्याप टळलेला नसून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा घाट परिसरासाठी मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' कायम ठेवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update

शुक्रवारी राज्यातील पुणे घाट आणि सातारा घाट परिसरासाठी मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' (Orange Alert) देण्यात आला आहे. तर पालघर, नाशिक घाट, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट या भागात पावसाचा जोर काहीसा कमी होऊन 'यलो अलर्ट' राहील. याशिवाय विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. २४ जुलै रोजी कुठल्याही जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला नाही.

शनिवारी २५ जुलै रोजी पावसाचा जोर आणखी कमी होणार असून या दिवशी राज्यात ऑरेंज आणि रेड अलर्ट पूर्णपणे निरंक राहतील. २५ जुलैला केवळ रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाट आणि सातारा घाट या भागांत हवामान विभागाने 'यलो अलर्ट' कायम ठेवला आहे. उर्वरित महाराष्ट्रात पावसाची तीव्र तीव्रता कमी झालेली पाहायला मिळेल.

त्यानंतर २६ जुलै (रविवार) आणि २७ जुलै (सोमवार) रोजी हवामानात अधिक सुधारणा होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या दोन्ही दिवशी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी ऑरेंज किंवा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. या कालावधीत केवळ पुणे घाट परिसरात यलो अलर्ट राहील, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये 'ग्रीन अलर्ट' (Green Alert) राहण्याची शक्यता हवामान वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे विकेंडनंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याणमध्ये खळबळ! लॉजमध्ये जखमी अवस्थेत आढळले बहीण-भाऊ; कारण अत्यंत चिंताजनक, पोलीसही हादरले

Maharashtra News Live Update: पुणे नाशिक महामार्गावर तिरंगा हातात घेत चार तरुणांचे आंदोलन

आषाढी एकादशीसाठी उपवासाला बनवा चविष्ट शेंगदाण्याचे लाडू, सोपी आहे रेसिपी

VIDEO : अभिजीत दीपके आंदोलनावर ठाम; केंद्राचा प्रस्ताव CJP ने फेटाळला, प्रधानांच्या राजीनाम्याचा पुनरूच्चार

Foot health: शरीरातील अनेक गंभीर आजारांचे पहिले संकेत पायांमध्ये दिसतात, ही 7 लक्षणं वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT