राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस पडला आहे. पुढचे २४ तास हे अत्यंत महत्त्वाचे सांगण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे. मुंबईत पुढचे काही तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert)
राज्यात अनेक ठिकाणी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.आज रायगड आणि पुणे घाटात रेड अलर्ट सांगण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे,पालघर, पुणे घाट, सातारा घाट,रत्नागिरी, छ.सुंभाजीनगर, बीड या जिल्ह्यांना आज ऑरेंज देण्यात आला आहे.
याचसोबत छत्रपती संभाजी नगर, पुणे घाट आणि रायगड या जिल्ह्यांना उद्यादेखील ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढच्या ४८ तासात या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे.यामुळे आज सकाळी अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. याचसोबत पावसाचा रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला होता. दरम्यान, आता मुंबईसह उपनगरात पावसाने उसंत घेतली आहे.
अलर्ट म्हणजे काय?
रेड अलर्ट म्हणजे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट ही एक चेतावणी असते.
ऑरेंज अलर्ट म्हणजे सतर्कतेचा इशारा असतो. या ठिकाणी खूप जोरात पाऊस पडू शकतो.
येलो अलर्ट म्हणजे संततधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना लक्ष द्यावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.