Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : आलीशान गाड्या, बंगले, अन् रग्गड पैसा! समृद्धी महामार्गाने शेतकरी झाले मालामाल

समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांवर अक्षरशः पैशाचा पाऊस पडला. दुप्पट, तिप्पट किंमतीने त्यांच्या जमिनी खरेदी केल्या गेल्या. शेतकऱ्यांनीच सांगितलेली त्यांच्या भरभराटीची कथा...

Gangappa Pujari

Samruddhi Mahamarg: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांशी प्रकल्प समजला जाणारा समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. सुरूवातीला या महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध होता. मात्र कालांतराने हा विरोध मावळला. हा महामार्ग तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी किंमत देवून या जमिनी खरेदी करण्यात आल्या.

समृद्धी महामार्गाने या शेतकऱ्यांना रातोरात मालामाल केले. पाहूया याबद्दलची ही खास पोस्ट.

याबद्दलची अधिक माहिती अशी की, राज्यात सर्वात मोठा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला सुरूवातीला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होता. नागपूर येथील रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे( EKnath Shinde) यांना भेटण्यासाठी आलेले अहमदनगर जिल्ह्यातील धोत्रा ​​(कोपरगाव) येथील शेतकरी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले की, यापूर्वी आम्ही या प्रकल्पाला विरोध करण्याचा विचार केला होता.

आम्ही आमची जमीन देण्यास तयार नव्हतो. सरकारला जमीन देण्याचा त्यांचा अनुभव चांगला नव्हता. 2004 साली कालवा बांधण्यासाठी त्यांची 4 गुंठे जमीन शासनाने घेतली होती, मात्र आजही ते नुकसान भरपाई मिळण्यासाठी मंत्रालयात चकरा मारत आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकारचा हाच अनुभव मी समृद्धी महामार्गासाठी जमीन मागितली असता राधेश्याम मोपलवार यांना सांगितला. त्यांनी जमीन घेण्यापूर्वी पैसे मिळतील, असे आश्वासन दिले, पण त्यावर आमचा विश्वास बसला नाही. मात्र, मोपलवार यांनी आपले आश्वासन पाळले. 2017 मध्ये आमच्या बँकेत 98 लाख रुपये जमा झाले.

2018 मध्ये सरकारने त्यांच्याकडून 11 गुंठे जमीन घेतली. या रकमेतून त्यांनी 10 एकर जमीन खरेदी केली आहे. छान घर बनवलं आणि एका आलीशान गाडीचे मालकही झाले. त्यांना जमिनीच्या रेडी रेकनर दरापेक्षा 10 पट जास्त पैसे मिळाले आहेत.

12 एकर जमिनीसाठी 18.50 कोटी रुपये मिळाले

औरंगाबाद जिल्ह्यातील जयपूर शेंद्रा एमआयडीसी संकुलात राहणारे भगवान माटे म्हणाले की, समृद्धी महामार्गसाठी त्यांची १२ एकर जमीन घेतली आहे. त्यांना 18 कोटी 50 लाख रुपये मिळाले. यातील 20 एकर जमीन त्यांनी 4 कोटी रुपयांना विकत घेतली आणि 5 कोटी रुपये भूखंडावर गुंतवले. औरंगाबाद शहरात दीड कोटी रुपयांना घरही घेतले. समृद्धी महामार्गाने त्यांना समृद्ध केले आहे.

एक एकर जमीन देऊन 7 एकर जमीन खरेदी केली

औरंगाबाद जिल्ह्यातील भांबर्डा येथील रहिवासी बाळासाहेब काळे यांनी सांगितले की त्यांची एक एकर जमीन समृद्धी महामार्गावर घेण्यात आली होती. त्याला नुकसानभरपाईचे इतके पैसे मिळाले की त्याने आणखी जमीन विकत घेतली. त्यांनी 7 एकर जमीन 2 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. बँकेत एक कोटी जमा झाले आहेत. काळे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, महामार्गासाठी त्यांची जमीन संपादित झाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. (Samrudhi Highway)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT