Sharad Pawar Video: पंतप्रधानांची गॅरंटी खोटी; भाजप- मोदींच्या विश्वासाला तडा बसला', शरद पवारांचे टीकास्त्र
Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar News: पंतप्रधानांची गॅरंटी खोटी निघाली, भाजप- मोदींच्या विश्वासाला तडा बसला', शरद पवारांचे टीकास्त्र; पाहा VIDEO

Gangappa Pujari

बारामती, ता. २० जून २०२४

लोकसभा निवडणुकानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामती तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते बारामतीमधील दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. आज त्यांच्या या दौऱ्याचा तिसरा दिवस असून या सर्व दुष्काळी भागाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले शरद पवार?

"या दुष्काळी दौऱ्यातून शेतकऱ्यांशी संवाद झाला. दुष्काळी भागाला न्याय देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत त्यात बऱ्याच गोष्टी दुरुस्त करण्याची गरज आहे. या दौऱ्यामुळे लोकांचे सुख दुःख जाणून घेण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सुद्धा आम्ही दौरा करणार असून राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्ष ज्या जागा आहेत तिथे जाऊन देखील आम्ही लोकांशी भेटणार आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी आरएसएसने घेतलेल्या बैठकीवरुनही महत्वाचे विधान केले. "महाराष्ट्रात आणि बाहेर सुद्धा भाजप, मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांना विश्वासाला तडा बसला आहे. मोदींची गॅरंटी खोटी निघाल्या, मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा विश्वास नाही," अशी टीका त्यांनी यावेळी केली.

राज्यात सुरू असलेल्या ओबीसी- मराठा बांधवाच्या संघर्षावरुनही शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले. "केंद्र सरकारने यात पुढाकार घेतला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात बदल करायला लागेल, केंद्राला बघ्याची भूमिका घेतली जाणार नाही सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याची जबाबदारी सगळ्यांची आहे," असे म्हणत या प्रश्नी केंद्र सरकारने लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचा जुळून आलाय लग्नाचा योग; जोडीदार मिळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Ahmednagar Politics: निलेश लंकेंची खासदारकी धोक्यात? विखेंच्या मागणीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील

Ladka Bhau Yojana: विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन योजनेची घोषणा; काय आहे योजना अन् पात्रता

Maharashtra Politics: राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती ऑगस्टमध्ये होणार

Bhimashankar Sugar Factory News| अर्थकारणाला चालना देणारा भिमाशंकर सहकारी साखर कारखाना पुरस्काराने सन्मानित

SCROLL FOR NEXT