महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे 'ऑपरेशन टायगर'च्या यशाची उघडपणे घोषणा करू शकत नाहीत. उद्धव गटातील खासदारांचे म्हणणे आहे की, यावेळी पक्षात फूट पाडणे २०२२ इतके सोपे नसेल.

Bharat Jadhav

  • 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  • ठाकरे गटाचे सहा खासदार चर्चेच्या केंद्रस्थानी

  • राजकीय हालचालींना वेग

महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींना वेग आलाय. या घडामोडींच्या केंद्रस्थानी असे सहा लोकसभा खासदार आहेत, ज्यांनी ठाकरे गटाविरुद्ध बंड केले आहे. दरम्यान २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी जेव्हा पहिल्यांदा ठाकरे गटात फूट पाडली होती, त्यावेळी याच सहा खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली नव्हती.

आता हेच खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे, मात्र त्याच दरम्यान शिंदेंना ऑपरेशन टायगर करणं सोपं नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून केली जातोय. यामुळे काहीही घडू शकते, दुसरीकडे या सहा खासदारांपैकी कोणीही आतापर्यंत उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलेली नाहीये.

खासदारांनी बंड केलं तेव्हा ते शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या दिवशी शिंदे गटात सामील होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र नंतर ही बातमी फेटाळून लावण्यात आली. दुसरीकडे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे फुटीर खासदाराच्या गटात सामील झाले नाहीत. ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांशी संबंधित खटल्यात काल एका विशेष न्यायालयाने निकाल दिला.

न्यायालायने ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात निकाल दिला. या निकालावर ओमराजे निंबाळकर नाराजी वर्तवली असून ते प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण आपल्या राजकीय भवितव्याबाबत पुढील दोन दिवसांत निर्णय घेऊ असं सांगितलं. तसेच आपण उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंच्या विरोधात कधीही बोलणार नाही, असंही सांगितलं.

ओमराजेंच्या निष्ठेवर प्रश्न

२०२२ मधील बंडापूर्वी ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जात होते. मात्र, बंडखोरांच्या यादीत त्यांचे नाव आल्यानंतर त्यांच्या निष्ठेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचदरम्यान ओमराजे यांना त्यांच्या वडिलांच्या खटल्यात अनुकूल निकाल मिळण्याचे आश्वासन देण्यात आले होते; त्यामुळे ते शिंदे गटात जात असल्याचा दावा संदय राऊत यांनी केला होता.

शिंदें गटाचा दावा काय?

भाजप आणि ते नैसर्गिक मित्रपक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारधारेशी तडजोड केली. म्हणूनच ते शिवसेनेला उद्धव ठाकरेंपासून दूर जात आहेत. एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदा बंड केलं होतं त्यावेळी म्हटलं होतं की, "बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हा रक्ताच्या नात्यावरून नाही, तर विचारधारेवरून ठरवला जाईल."

त्यावेळी शिंदे गटाने थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. नेत्यांना आणि पक्ष कार्यकर्त्यांना भेटण्यापेक्षा घरी राहण्यालाच ते अधिक पसंती देत ​​असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तसेच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सहवासामुळे शिवसेनेच्या आमदारांना अडचणींचा सामना करावा लागत होता, म्हणूनच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

आताची परिस्थिती वेगळी

शिंदे गटाने 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत ठाकरे गटाचे ६ खासदारांना शिंदेंनी ओढलं. आताही शिंदे गटाकडून अजूनही तेच आरोप केले जात आहेत. पहिला आरोप असा की, ठाकरे आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या तयारीत आहेत. दुसरा आरोप असा की, ते पक्षाचे नेते आणि खासदारांना भेटत नाहीत. दरम्यान आतापर्यंत बंडखोर खासदारांपैकी कोणीही यासंदर्भात कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या निष्ठावान खासदारांनी शिंदे गटाने केलेले हे आरोप फेटाळून लावलेत. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ त्यांनी युक्तिवादही मांडलेत. 'शिवसेना दिन'निमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी पक्ष विलीनीकरणाची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. त्यांनी सांगितले की, शिवसेना तीन दशके भाजपची मित्रपक्ष होती, पण कधीही त्यात विलीन झाली नाही; त्यामुळे आता हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल असे मानण्याचे काहीच कारण नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दोन दिवसात सोनं- चांदी दरात मोठी वाढ! सोनं साडेचार हजारांनी तर चांदी अकरा हजार रुपयांनी महाग

Government Schemes : सरकारी योजनांवर VIDEO बनवा अन् कमवा तब्बल 1 लाख रुपये, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा

Vanita Kharat: फोन उचलताच बँक अकाऊंट रिकामं, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनीता खरातला हजारोंचा गंडा घातला; VIDEO चर्चेत

VIRAL VIDEO : बाबोSSS...दुबईतील शाळांची फी किती? विद्यार्थीनीच्या आईने सांगितला अविश्वसनीय आकडा, बघून डोळे पडतील पांढरेफट्ट

Sukanya Samruddhi Yojna : Sukanya Samruddhi Yojna: मुलींच्या भविष्यासाठी आताच निर्णय घ्या, सुकन्या समृद्धी योजनेत अशी करा गुंतवणूक?

SCROLL FOR NEXT