Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Maratha leader Manoj Jarange Patil : आंदोलनात सहभागी न होणाऱ्या नेत्यांना पुन्हा इशारा, नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?

Manoj Jarange Patil : येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात सहभागी न होणाऱ्या राजकीय नेत्यांना निवडणुकीत पाडा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी चावडी बैठकीत दिला

Alisha Khedekar

  • मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत ऐतिहासिक आंदोलन होणार.

  • मनोज जरांगे यांनी आंदोलनात सहभागी न होणाऱ्या नेत्यांना निवडणुकीत पाडण्याचे आवाहन केले.

  • चावडी बैठकीतून राज्यभर जनजागृती; समाजामध्ये संतापाचा सूर.

  • आंदोलन फक्त आरक्षणासाठी नाही, तर राजकीय समीकरणांवरही प्रभाव टाकणारे ठरणार.

मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी पुढील निर्णायक टप्पा म्हणून घोषित करण्यात आलेल्या २९ ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अधिक धारदार रूप दिले आहे. धाराशिवमध्ये पार पडलेल्या बैठकीत बोलताना त्यांनी थेट इशारा दिला की, "जो नेता २९ ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, त्याला आगामी सर्व निवडणुकांमध्ये पाडा", असे आवाहन मराठा समाजाला त्यांनी केलं आहे.

दरम्यान, राजकीय पक्षांच्या भूमिका, सत्ताधाऱ्यांची उदासीनता, आणि आरक्षणप्रश्नी सुरू असलेली वेळकाढूपणा यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजात पुन्हा एकदा आंदोलनाची लाट उसळू लागली आहे. मनोज जरांगे सध्या राज्यभर चावडी बैठकींच्या माध्यमातून जनजागृती करत असून, मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर झाला पाहिजे, अन्यथा व्यापक आंदोलनाच्या तयारीत राहा, असा संदेश ते गावागावांत पोहोचवत आहेत.

धाराशिव येथील बैठकीत त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “आता वेळ आली आहे, केवळ घोषणा पुरेशा नाहीत. जे खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या मागे आहेत, त्यांनी २९ ऑगस्टला मुंबईला यावं. जो येणार नाही, त्याचा राजकीय निकाल पुढच्या निवडणुकीत समाजाने लावावा.” मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार वेळ मारून नेत असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, आता फक्त आश्वासनं चालणार नाहीत, निर्णय हवा आहे. आंदोलनाच्या दिवशी राज्यभरातील लाखो मराठा बांधव मुंबईत जमणार असून, हे ऐतिहासिक आंदोलन ठरणार आहे.

विशेष म्हणजे, याआधी देखील मनोज जरांगे पाटील यांनी जलसमाधी आंदोलन करून राज्य सरकारला अडचणीत आणलं होतं. यंदाच्या आंदोलनाकडे सरकार व प्रशासन कसे पाहते, याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहणार आहे. जर या आंदोलनाला नेत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर हे राजकीय भूकंपाचे कारण ठरू शकते. मराठा समाजाची ताकद निवडणुकांमध्ये किती निर्णायक ठरते, हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे २९ ऑगस्टचे आंदोलन केवळ आरक्षणासाठीच नव्हे, तर राजकीय समीकरणांसाठीही टर्निंग पॉईंट ठरू शकते.

२९ ऑगस्ट रोजी काय आंदोलन होणार आहे?

२९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन होणार असून, लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी नेत्यांना काय इशारा दिला आहे?

जो नेता आंदोलनात सहभागी होणार नाही, त्याला आगामी निवडणुकीत पाडा, असा इशारा त्यांनी मराठा समाजाला दिला आहे.

या आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे?

सरकारकडून वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप करत, आरक्षणासाठी निर्णायक दबाव निर्माण करण्यासाठी हे आंदोलन आयोजित केले जात आहे.

याआधीही अशा आंदोलनांचा परिणाम झाला आहे का?

होय, याआधी मनोज जरांगे यांच्या जलसमाधी आंदोलनामुळे राज्य सरकारवर दबाव निर्माण झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही - मनोज जरांगे पाटील

Success Story: जम्मू काश्मीरमधील पहिल्या महिला IPS, पुन्हा UPSC क्रॅक; IAS रुवेदा सलाम यांचा प्रवास

Mangal Gochar: 18 महिन्यांनी मंगळ करणार शुक्राच्या घरात प्रवेश; 'या' राशींचं नशीब चमकणार, आर्थिक प्रगती होणार

Wednesday Horoscope : भगवान गणेशाची कृपा होणार, गुप्तधनाचे मार्ग सापडतील; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार, वाचा

Local Body Polls 2025 : 'पालिका निवडणुकीत VVPT नाही'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, VIDEO

SCROLL FOR NEXT