Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari  Saam Tv
महाराष्ट्र

Bhagat Singh Koshyari: 'तर दुसऱ्याच दिवशी १२ आमदारांची नियुक्ती केली असती…' कोश्यारींचे मोठे विधान

Gangappa Pujari

Maharashtra Politics: राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा कार्यकाळ अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली.

विशेष त्यांच्या काळात गाजलेला मुद्दा म्हणजे 12 आमदारांच्या फाईलवरील सही. जी अखेरपर्यंत त्यांनी केली आहे. त्यावरुन अजून वाद सुरुच आहे. आता पदावरुन पायउतार होताच त्यांनी यामागचे कारण स्पष्ट केलं आहे. (Bhagat Singh Koshyari)

अलिकडेच माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अनेक मुद्यांवर सविस्तरपणे उत्तरे दिली. यावेळी त्यांना १२ आमदारांबाबत शेवटपर्यंत निर्णय घेतला नाही? असं भगतसिंह कोश्यारींना विचारण्यात आले .

त्यावर कोश्यारींनी , “महाविकास आघाडीची शिष्टमंडळ येत राहिली. त्यांना सांगितलं, हे पाच पानांचं पत्र पहा. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. पाच पानांच्या पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत, कायदे सांगत आहात. शेवटी लिहतात १५ दिवसांत मंजूर करा.”

संविधानात कुठे लिहिलं आहे? ते जेव्हा समोर येईल, तेव्हा तुम्हाला कळेल की सत्य काय आहे. तसं पत्र पाठवलं नसतं, तर मी पुढच्याच दिवशी त्यावर सही करणार होतो. तुम्ही असली पत्र लिहिता, असा आरोप त्यांनी महाविकास आघाडीवर केला.

सध्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये चाललेल्या वादावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे संत माणूस आहेत. ते कुठे राजकारणात आले? त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी होती," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तसेच "मी महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी मला विमानातून उतरवलं होतं. आता नियतीने त्यांना खुर्चीवरून काली उतरवलं आहे.” अशी खोचक टीकाही माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...

SRH vs PBKS: अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची बॅट तळपली! हैदराबादसमोर विजयासाठी २१५ धावांची गरज

Today's Marathi News Live: पिंपरी चिंचवड शहरात आज पुन्हा वळवाच्या पावसाची हजेरी

Singapore Corona News |चिंता वाढली! सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर

Yogi Adityanath: मोदी तिसऱ्यांदा PM झाल्यास 6 महिन्यात POK भारताच्या ताब्यात असेल, योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT