बुलढाणा जिल्ह्यात कळ सायंकाळी काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली या पावसाने शेतकऱ्यांची दैना अवस्था करून टाकली.. शेतात उभे असलेली व काढणीला आलेली मका, सोयाबीन, तूर या पिकाच मोठ नुकसान झालय. . धाड परिसरात मुसळधार पाऊस झाला त्यात हवेचा जोर असल्याने रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली तर नदी नाल्याना पूर आला.. या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतलंय त्यामुळे शेतकरी हवाल्दील झालंय.. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे...
नागपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहसरकार्यवाह अतुल लिमये यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक.
रेशीमबागमध्ये बैठकीचे आयोजन.
भाजपचे नागपूरचे आमदार आमदार आणि पदाधिकारी देखील राहणार उपस्थित अशी माहिती..
जळगाव धरणगाव एकीकडे राज्य सरकार लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशिल असतांना धरणगाव येथील आरबीएल बँकेत मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे लाभार्थी महिलांना खूप अडचणी येत आहेत. ऐण सणासुदीच्या काळात पैसे काढता येत नसल्यामुळे या भगिनींना खूप त्रास सहन करावा लागत आहे. यात दुसऱ्या तालुक्यातील महिला देखील येथे फेऱ्या मारत असल्या तरी त्यांना लाडक्या बहिणीचे खात्यात पैसे येऊनही योजनेचे पैसे मिळत नाही. यालाच कंटाळून आज अनेक महिलांनी चक्क रस्ता रोको आंदोलन करून ठिय्या मांडला व संताप व्यक्त केला. त्यानंतर प्रशासनाने बँकेच्या अधिकाऱ्यांना त्वरित कर्मचारी वाढवण्यासाठी सूचना या ठिकाणी दिले
मावळच्या मायबाप जनतेचा मागील पाच वर्षापासून या विश्वासाने काम केलं आहे. ज्या जबाबदारीने त्यांचे प्रश्न सोडवले त्याच प्रेम मला आज याठिकाणी पाहायला मिळते,आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुती म्हणून तालुक्यातील गरीब जनतेन प्रेम या आजच्या कार्यक्रमातून दाखवल आहे. मावळात महायुतीचा उमेदवार कोण आहे हे आद्यप निश्चित झालेले नाहीये परंतु समाधान आहे मागील पाच वर्षाचा कामाचा लेखाजोखा पाहायला तर समाधान देखील व्यक्त करते मला विश्वास आहे येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार एक चांगला मताधिक्य घेऊन विजय होईल.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादांनी देहूरोड कॅन्टोमेंट भागात मागील महिन्यामध्ये साधारणता 12 कोटी 80 लाख रुपयाचा निधी दिला आहे. येत्या काही दिवसात आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते त्या अनुषंगाने कामांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून मग त्यामध्ये पर्यंत आम्ही पूर्ण प्रक्रिया केली आहे आणि येणारा काही दिवसांमध्ये ही विकासकामें सुरू होतील जेणेकरून आचारसंहिता सुरू झाल्यावरती कुठलीही तांत्रिक अडचण राहू नये याकरता आम्ही देखील सर्वच कामांचा शुभारंभ करतोय..
ओबीसींचा खरा शत्रू ब्राम्हण नसून या राज्यातील आमदार,खासदार या दरोडेखोरांची टोळी आहे असा घणाघाती आरोप ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मन हाके यांनी केला.हाके हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.नांदेड मधील हदगाव येथे हाके यांची सभा झाली.या सभेनंतर हाके यांनी माध्यमांशी बोलताना हे आरोप केलेत.जो कोणी मागास आहे त्यांना त्यांचा अधिकार देणारा ब्राम्हण होता.परंतु आजचा हा महाराष्ट्र बघायला मिळतोय ते फक्त काही ठराविक दरोडेखोरांचा वतनदारांचा महाराष्ट्र बघायला मिळत आहे.असा आरोप ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मन हाके यांनी केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्य अहवालाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन
‘जनसामान्यांच्या हक्काचा बुलंद आवाज- देवेंद्र फडणवीस’- असं या कार्य अहवालाचे नाव
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघ आणि राज्यात केलेल्या विकास कामांवर आधारित कार्य अहवाल
समाजातील सर्वच घटकांना विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा या कार्यअहवाल पुस्तिकेत सादर करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांचं बँड पथक रतन टाटा यांच्या निवासस्थानी दाखल
मुंबई पोलिसांचं बँड पथक देणार मानवंदना
रतन टाटा यांच पार्थिव सध्या त्यांच्या कुलाब्याच्या निवासस्थानी
मनोज जरांगे पाटलांचे गुरु बीडच्या नारायण गडाचे महंत शिवाजी महाराजांचे मोठे विधान
मनोज जरांगे पाटील पुढच्या काळात उपोषण करणार नाहीत - महंत शिवाजी महाराजांनी दिले संकेत
उपोषण हे एक तप आहे, आणि याच तपाची सांगता करण्यासाठी...पुढे उपोषण करणार नाही अशी प्रतिज्ञा घेण्यासाठी...
मनोज जरांगे पाटील हे या नारायण गडाच्या तपाच्या भूमित येत आहेत
बुलडाण्यामध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी शोले स्टाइल आंदोलन
सिंदखेडराजा येथील बी एस एन एल टॉवरवर एक तरुण रात्री चढला
जोपर्यंत मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी घेतली भूमिका
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता हलेकाय येथून टाटा यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात येईल.
सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए याठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.