नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसुल या ठिकाणी एंडाईत वस्तीजवळ चार मोठ्या चंदनाच्या झाडांची कत्तल करून चरी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात या चंदनाच्या झाडांची किंमत लाखो रुपयांच्या वर असून पोलिसांनी या चोरट्यां बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहे.
दरम्यान चोरट्यांनी चंदनाची झाडे कापण्यासाठी वापरलेले कटर मशीन जागेवरच सोडून पळ काढला आहे. पुष्पा स्टाईलने चोरी झाल्याच्या चर्चांना परिसरात उधाण आले होते.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ने प्रसिद्ध केली जाहिरात
मुंबई शहर पोलिस दलात सर्वाधिक जागा
पोलीस शिपाई पदासाठी १ हजार ७३३ जागा, वाहन चालक शिपाई पदासाठी १०५ आणि बॅन्डमन पदासाठी ३३ जागा भरल्या जाणार
पुणे कारागृह विभागात १३० पदांची भरती करण्यात येणार तर पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात ३२२ जागा आणि पुणे ग्रामीण पोलिस दलात ७२ जागांसाठी जाहिरात
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ स्पर्धेचे उद्घाटन हास्य जत्रा फेम श्रेया बुगडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी व्यासपीठावर महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी होते.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.विजय फुलारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कारभारी काळे उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री इच्छुक नसल्याने युती झाली नाही. आमदार दिपक केसरकर यांचा आरोप.
सिंधुदुर्गात युती होणार की नाही याबाबत सुरू होत्या उलट सुलट चर्चा.
युतीसाठी उदय सामंत आणि मी मुख्यमंत्र्यांना भेटलो.
रवींद्र चव्हाण यांना सुद्धा भेटलो मात्र पालकमंत्री नितेश राणे बहुदा इच्छुक नसल्याने युती झाली नाही, असा आरोप दिपक केसरकरांनी केला आहे.
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात आंदोलन सुरू आहे.
शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम राठोड यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक व्यापक करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
जिवती तालुका हा अतिदुर्गम व कोरडवाहू शेतीचा भाग असल्याने शेतकऱ्यांचे जगणे आधीच अवघड झाले आहे.
सांगली जिल्हा बँकेच्या कलम ८८ अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीवरील स्थगिती शासनाने उठवल्यानंतर आता याप्रकरणी काही आजी-माजी संचालकांसह तत्कालीन अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
बँकेचे ५० कोटी ५८ लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.
ऊस दराची पहिली ठिणगी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी येथे पाहायला मिळाली आहे. उसाचा दर जाहीर न करताच ऊस नेणारी वाहने भिलवडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरली.
ऊसाला पहिली उचल 37 51 रुपये तसेच गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला दोनशे रुपये मिळालेच पाहिजे त्याशिवाय वाहने सोडणार नाही असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी घेतला होता.
यामध्ये हुतात्मा कारखाना, क्रांती कारखाना, सोनहिरा व दत्त इंडिया सांगली कारखाना या कारखान्याची वाहने यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्याने अडवली.
यावेळी उस उत्पादक शेतकरी उपास्थित होते. आंदोलनाच्या वेळी भिलवडी पोलीस स्टेशन ने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रसिद्ध जाहिरात केली. मुंबई शहर पोलिस दलात सर्वाधिक जागा आहेत. पोलीस शिपाई पदासाठी १ हजार ७३३ जागा, वाहन चालक शिपाई पदासाठी १०५ आणि बॅन्डमन पदासाठी ३३ जागा भरल्या जाणार आहेत.
- राहुल गांधी यांनी आरोप केलेल्या कामठी विधानसभा मतदारसंघातच काँग्रेस उमेदवाराची डबल नोंदणी
- कामठी विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश यादवराव भोयर यांचं मतदार यादीत दुबार नाव
- एका मतदार यादीत घर क्रमांक 1 तर दुसऱ्यामध्ये घर क्रमांक 131
- एका मतदार यादीत वय 60 वर्षे तर दुसऱ्या यादीत वय 55 वर्षे
- 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सुरेश भोयर यांनी कामठी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती
नाशिक जिल्ह्यतील मालेगाव, बागलाण सह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी टरबुजची लागवड करण्यात येते या सीजन मध्ये चांगला भाव भेटेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. पिक देखील चांगले आले, मात्र गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या पावसाने टरबुजचे वेल कुजले आणी त्यामुळे फळावर देखील कुजीचा परिणाम झाला असल्याने फळाची वाढ खुंटली आणि उत्पादनात मोठी घट झाली, योग्य आकार नसल्याने व्यापारी खरेदी साठी इच्छुक नाही,त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्री करावे लगत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने शिंदेच्या शिवसेनेसह ठाकरे गटालाही जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष विकास सावंत यांचे पुत्र विक्रांत सावंत, ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश संपन्न झाला. या प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूकांच्या तोंडावर भाजपने मित्र पक्षांसह ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला असल्याच बोलल जात आहे.
सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नांनाने सांगलीच्या इस्लामपूरचे ईश्वरपूर झाले. त्यामुळे मित्र पक्ष व रयत क्रांती संघटनेच्या वतीने फटाके, पेढे, वाद्यांच्या गजरात, फुलांची उधळण करत आ. सदाभाऊ खोत यांचे ईश्वरपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ईश्वरपूर असा पहिला उल्लेख एका जाहीर सभेत केल्यानंतर या नामांतराच्या मागणीला वेग आला होता. नगरपालिकेच्या सभागृहातही “इस्लामपूरचे ईश्वरपूर” असे नामांतर करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर झाला होता. पावसाळी अधिवेशनात आमदार सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत ही मागणी मांडली होती. आमदार गोपीचंद पडळकर व आ. सदाभाऊ खोत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत देवाभाऊंच्या सरकारने ती मागणी आज मान्य केली आहे. यावेळी रयत क्रांती संघटना व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून “ईश्वरपूर” या नव्या नावाचा उत्सव साजरा केला.
- शहरातल्या अनेक भागात सकाळच्या सुमारास पडले दाट धुके
- वातावरणातील बदलामुळे नाशिक हरवलं धुक्यात
- मागील ६ महिन्यांच्या पावसानंतर शहरातील वातावरण बदलले
- तापमानाचा पार २२ अंशांवरून थेट १८ अंशांपर्यंत घसरला
- मागील ३ दिवसांत तापमानात ४ अंशांची घट
- येत्या काही दिवसांत थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता
अकोला मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात झालाय.. काल रात्री उशिरा अकोल्यापासून 15 किमी अंतरावर असलेल्या व्याळा गावाजवळ हा अपघात झाला. दोन ट्रकमध्ये अपघात होऊन 2 जण गंभीर झालेये.. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, खामगावकडून अकोल्याकडे येणाऱ्या ट्रक चालकाच वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थेट ट्रक डिव्हायडर तोडून अकोल्याहून खामगावकडे जाणाऱ्या ट्रकला धडकला.. स्थानिकांनी तातडीने वाहन चालक आणि क्लिनरला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलं. मात्र अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती.
जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील सातव्या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलीय. बाळू लिंबाजी सानप असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळा करून बाळू सानप हा आरोपी फरार झाला होता. सदरील आरोपी बीड येथील त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीवरून पोलीस पथकाने सदरील आरोपीस बीड येथून अटक केली. त्यानंतर त्यास जालना येथे आणून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घोटाळा प्रकरणी आतापर्यंत एकूण 7 आरोपींना जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत होत असून, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे थंड हवा दक्षिणेकडे सरकत आहे
राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या वतीने उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या हेतूने पेट्रोलची किरकोळ विक्री सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महामुंबईत ११, तर राज्यभरात एकूण २५० ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेलबरोबरच सीएनजी व इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट असलेले रिटेल विक्री पंप सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
संभाजीनगर-इंदोर महामार्गावर मुक्ताईनगरजवळ मध्यरात्री प्रवासी ट्रॅव्हल्स बस आणि टँकर यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. आकोटहून इंदोरकडे जाणारी ही बस होती. या अपघातात एक व्यक्ती जागीच ठार झाली, तर एका गंभीरसह एकूण सात जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे.
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील भागीमहारी तलावात दुर्दैवी घटना घडली. नागपूरचा रहिवासी अविनाश आनंद (२२) आणि चंद्रपूरचा रहिवासी संकल्प मालवे (१९) या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. हे दोघे आपल्या सहा मित्रांसह तलावाजवळ फिरायला गेले होते. अविनाश पोहण्यासाठी पाण्यात उतरला असता, तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र संकल्प मालवे यानेही तलावात उडी घेतली. मात्र, पाण्याचा खोलपणा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. अविनाश बी.ई. तृतीय वर्षाचा, तर संकल्प बारावीचा विद्यार्थी होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची आज पार पडणार पुण्यात बैठक होणार आहे. पुण्यातील पद्धाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे साधणार संवाद आणि मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची आज बैठक
अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी. बाजीराव रस्त्यावर घडलेल्या १७ वर्षीय तरुणाच्या खूनप्रकरणातील तीन अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी. मयांक सोमदत्त खरारे (वय १७) या तरुणाचा मंगळवारी दुपारी खून करण्यात आला. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात तीन अल्पवयीन आरोपींविरुद् गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. त्यावर बाल न्याय मंडळाने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.