मुक्ताईनगर,थकीत पगाराची मागणी केल्याच्या रागातून ढाबामालकाने सुरक्षारक्षकाच्या डोक्यात काठीने मारहाण केली. ही घटना मुक्ताईनगर - बऱ्हाणपूर महामार्गावरील उचंदा शिवारात घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय सुरक्षारक्षकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. गोकुळ तारासिंग जाधव (वय ५५, रा. मुक्ताईनगर, मूळ रा. निंबादूर, जि. बऱ्हाणपूर) असे मृत सुरक्षारक्षकाचे नाव आहे.
- खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा न दिसल्याने दुचाकी घसरून अपघात
- कुणाल महाले आणि प्रभाकर माने गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू
- दोघांनाही ८ ते १० टाके पडल्याची माहिती
- हिरावाडीतील अमृतधाम परिसरात घडली घटना
- खड्ड्यामुळेच अपघात झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांचा आरोप
- अमृतधाम परिसरातील खड्डे तातडीने बुजवण्याची स्थानिकांची मागणी
आषाढी एकादशीनंतर परतीच्या प्रवासावरील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे उद्या पुण्यात आगमन होणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात, तर तुकाराम महाराजांची पालखी नवी पेठेतील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामी राहणार आहे. मंदिरांमध्ये फुलांची सजावट, रोषणाई, वारकऱ्यांच्या मुक्कामासह धार्मिक कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली आहे.
राज्य शासनाच्या कामगार विभागणी 13 जुलैला काढलेला अध्यादेश बांधकाम कामगारावर घोर अन्याय करणारा असून तो रद्द करावा या मागणीसाठी कामगार संघटना आक्रमक झाली असून कामगार संघटनेने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केल आहे.शासन हे कामगारावर अन्याय करणारा निर्णय घेत असेल तर तो अन्याय आम्ही हाणून पाडू जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही याच्या विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून लढा सुरू ठेवणार असल्याचं आंदोलकांनी सांगितल आहे.
जालना जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत आहे.जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अडीच वर्षांपूर्वी बिनविरोध झाली होती. त्यामुळं आज होणारी निवडणूक देखील बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान अडीच वर्षांपूर्वी निवडप्रक्रियावरून भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे हे आमने सामने आले होते. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे अध्यक्षपद आणि भाजपकडे उपाध्यक्षपद असा फॉर्म्युला ठरला होता.आता अडीच वर्ष पूर्ण झाल्याने पुन्हा निवडणूक होत आहे.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुंगी गुडीया म्हटल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व माजी खासदार संजय काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे शब्द मागे घेऊन सार्वजनिक माफी मागावी, अशीही पत्राद्वारे मागणी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील श्री महासिद्ध संस्थानमध्ये पारंपरिक गोवर्धन पूजा व रथोत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पडला. गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी सातपुड्याच्या पायथ्याशी जाऊन देव व गोमातेची पूजा केली. मानाचा झेंडा चढवून धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले तसेच गुरांना भाकऱ्या खाऊ घालण्याची परंपराही पार पडली. विशेष म्हणजे पूजा संपताच परिसरात पावसाने हजेरी लावल्याने भाविकांनी याला वरुणराजाची कृपा मानले. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून चांगल्या हंगामाची आशा व्यक्त केली जात आहे...
सायबर फसवणुकीसाठी 'म्युल अकाउंट' म्हणजेच बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटद्वारे देशभरातील 65 नागरिकांची तब्बल 150 कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.आळंदी पोलिसांनी आरोपी सचिन काळे याला अटक केली आहे.
सायबर फसवणुकीतील काळा पैसा स्वीकारण्यासाठी स्वतःचे बँक खाते म्युल अकाउंट म्हणून वापरू देणाऱ्या आणि नागरिकांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा यवतमाळ पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक करण्यात आली आहे. सहा नागरिकांची तब्बल सहा लाख 93 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे.
वाशिम तालुक्यातील अडोळी ते अटकळी या पांदण रस्त्याची आणि पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक वर्षांपासून पूल तुटलेल्या अवस्थेत असून रस्ताही पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील धामणी येथील अरुणावती नदीला आलेल्या मोठ्या पुरानंतर येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या, ओंडके आणि इतर कचरा अडकून पडला आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह बाधित होत असून बंधाऱ्याजवळ पाणी अडत असल्याचे चित्र आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.