महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: वेंगुर्ल्यात मायनिंग वाद तापला; 7 जण ताब्यात, jsw च्या मोजणीला विरोध

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : महाराष्ट्रातील ठळक बातम्या, राज्यातील मान्सूनचा अंदाज, पावसाचा इशारा, राजकीय घडामोडी, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Bharat Jadhav

दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत रत्नागिरीतील तरुण सहभागी

दक्षिण आफ्रिकेत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत रत्नागिरीच्या प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ या दोघांनीही यशस्वीपणे ९० किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करून जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.डर्बन ते पीटरमॅरिट्झबर्ग दरम्यानच्या अत्यंत आव्हानात्मक 'अप रन' मार्गावर पार पडलेल्या या स्पर्धेत अभिजित पड्याळ यांनी पहिल्याच सहभागात ९ तास ५१ मिनिटांत स्पर्धा पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली

वेंगुर्ल्यात मायनिंग वाद तापला; 7 जण ताब्यात, jsw च्या मोजणीला विरोध

वेंगुर्ला तालुक्यातील आजगाव-धाकोरा येथे मायनिंग सर्वेक्षणावरून वाद पेटला आहे.

ड्रोन सर्वे करत असताना 7 जणांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडले व त्यांचा ड्रोन फोडून टाकला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी हा ड्रोन सर्वे करण्यास सांगितल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

महाबळेश्वरातील 'गोल्फ कोर्स' प्रकरणात कारवाई; वृक्षतोड व उत्खननप्रकरणी चेअरमन-सचिवावर गुन्हा

हाबळेश्वर येथील हेरिटेज क्षेत्रातील प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या वृक्षतोड आणि उत्खननप्रकरणी संबंधित संस्थेच्या चेअरमन आणि सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर महाबळेश्वर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात परवानगीशिवाय वृक्षतोड आणि उत्खनन केल्याचा आरोप असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

तसेच उच्चस्तरीय समितीच्या पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

भुसावळ विद्यार्थी सुरक्षेसाठी दामिनी पथकाची धडक मोहीम

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ‘विद्यार्थी सुरक्षा उपक्रमा’अंतर्गत भुसावळ शहरात दामिनी पथकाने विशेष मोहीम राबवली. शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात भेटी देत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक काळे व त्यांच्या पथकाने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. तसेच टवाळखोरांवर वचक बसवण्यासाठी विशेष गस्त घालण्यात आली. विद्यार्थ्यांना पोलीस हेल्पलाईन व तक्रार निवारण यंत्रणेची माहिती देत सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले.

इंदापूर कचरा डेपोला अचानक आग; नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण

इंदापूर शहरातील कचरा डेपोला काल रात्री अचानक आग लागली.

नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

मात्र पालखी सोहळा जवळ आला की कचरा डेपोला आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे.

आग लागली की लावली? असा थेट सवाल नागरिक करत असून, याप्रकरणी नगराध्यक्ष व संबंधित ठेकेदारांनी खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.

खडकपूर्णा पूर्णपणे तळाला; पावसाअभावी पाणीटंचाईचे संकट गडद

बुलढाणा पाटबंधारे विभागाच्या आजच्या जलाशय अहवालानुसार जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्प मिळून एकूण जलसाठा केवळ 22.37 टक्के शिल्लक आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रमुख खडकपूर्णा धरणात शून्य टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला असून मृतसाठ्यावर परिस्थिती पोहोचली आहे.

नळगंगा व पेनटकळीसह अनेक प्रकल्पांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे.

मान्सून अद्याप दमदारपणे सक्रिय न झाल्याने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद झाले असून प्रशासनाने तातडीने नियोजन न केल्यास नागरिकांसह शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे

अमरावतीमध्ये चाकू हल्ला करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली अचलपूर शहरातून धिंड

अमरावतीच्या अचलपूर मध्ये चाकू हल्ला करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली अचलपूर शहरातून धिंड...

कायद्यात तर फायद्यात राहाल अमरावती पोलिसांचा संदेश..

अचलपूर या ठिकाणी नऊ तारीखेला झाला होता चाकू हल्ला..

दोन तरुणांची अचलपूर पोलिसांच्या वतीने परतवाडा या ठिकाणी दिंड काढण्यात आली.

Water Crisis : यवतमाळ जिल्ह्यातील 75 प्रकल्पात 33% जलसाठा

यंदा एल-निनोच्या तीव्र प्रभाव आहे पाऊस कमालीचा लांबणीवर पडलाय

अशा बिकट परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण 75 प्रकल्पांमध्ये केवळ 33% इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे.

भविष्यात जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ नये

यासाठी शासनाने तातडीने कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या असून संपूर्ण जिल्हा प्रशासनाला हाय अलर्ट वर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Nandurbar : नवापूरच्या काळआंबा परिसरात पाणीटंचाईवर मात

नवापूर शहरात दरवर्षी जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावीत यांनी पुढाकार घेतला आहे.

काळआंबा परिसरात माता भगिनींची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी त्यांनी स्वखर्चातून 5 हजार लिटर क्षमतेच्या सिटेक पाण्याच्या टाक्या बसवल्या असून, नुकतेच याचे लोकार्पण करण्यात आले.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 30 जूनच्या मुदतीने धडकी

कापूस लागवडीसाठी मान्सूनपूर्व आणि 30 जून पर्यंतचा कालावधी महत्त्वाचा मानला जात असून यातून शेतकरी अधिक कापूस उत्पादनासाठी घाई करतात कालावधी लांबला तर कापसाचे उत्पादन कमी येते यावर्षी मान्सूनची आगेकूच रेंगाळली आहे.20 ते 22 जून नंतरच पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे,यामुळे या कालावधीत नंतरच शेतकऱ्यांना पेरणी करता येणार आहे.

अभिजित दिपके यांच्या आंदोलनाचा पार्श्वभूमीवर पोलीसांचा मोठा बंदोबस्त

आज नागपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आहे. राजस्थानधील जयपूर झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Pune : केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणातील धक्कादायक बाब उघड; गर्भलिंग निदानासाठी जनावरांच्या मशीनचा वापर

Mumbai Mayor Accident: मुंबई महापौरांच्या गाडीला अपघात; धडाधड तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

Sindhudurg Fort : कोकण किनाऱ्यावरील ऐतिहासिक वैभव! खूप कमी लोकांना माहितेय छत्रपती शिवाजी महाराजांचा 'हा' किल्ला

Bollywood Singer : अरिजीत सिंहनंतर बॉलिवूडचा आणखी एक प्रसिद्ध संगीतकार घेणार Retirement? 'त्या' पोस्टने रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT