तंत्रज्ञानाच्या प्रगतीचं अनोखं उदाहरण रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये पाहायला मिळालं. येथे दोन ह्युमनॉइड रोबोट्सचा प्रतीकात्मक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात रोबोडॉगनं नवदांपत्याला विवाहाच्या अंगठ्या पोहोचवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रगतीचं प्रदर्शन करण्यासाठी या अनोख्या विवाहाचं आयोजन करण्यात आलं.
मोशी कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली.. जी तीन मजली इमारत कोसळून एका कामगाराचा जीव गेला आणि आठ कामगारांच्या जीवाशी तब्बल 65 तास खेळ झाला. त्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारतीच्या केवळ तळमजल्यालाचं पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलाय. महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेला हा पूर्णत्वाचा दाखला समोर आलाय. 27 जुलै 2023ला या ऍडमिन बिल्डींगला रेकॉर्ड प्लॅन नुसार पूर्णत्वाचा दाखला मंजूर करण्यात आला. मात्र या दाखल्यात फक्त तळमजल्याचाचं उल्लेख आहे. मग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नाही का?
लोणावळ्यातील पूरग्रस्त भागांना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी आणि नुकसानीची माहिती घेतली.यावेळी पूरग्रस्तांनी घरांमध्ये शिरलेले पाणी, झालेले आर्थिक नुकसान तसेच प्रशासनाकडून अपेक्षित मदतीबाबत आपल्या व्यथा आमदारांसमोर मांडल्या. नागरिकांना धीर देताना आमदार शेळके यांनी लोणावळा नगरपरिषद आणि टाटा धरण प्रशासनाशी समन्वय साधून पूरग्रस्तांना शक्य तितक्या लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, दरम्यान तळेगाव नगरपरिषद प्रशासनाने इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढली नाही, टाटा धरणाने एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी सोडले.
रावेर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शहरात वेग कारमधून पोलिसांनी दोघांना साहित्यासह अटक केली. यातील तिघे फरारी झाले आहेत. कारमध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांची २४ बंडले आढळून आल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
मध्य रेल्वेच्या बडनेरा अमरावती रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्रमांक एस-01, जुनीवस्ती,बडनेरा येथे सुमारे 67 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या चार लेनच्या रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पणरविवार रोजी सकाळी होणार आहे. मात्र या लोकार्पणापूर्वीच श्रेयवादाच्या राजकारणाने जोर धरला असून आमदार रवी राणा यांच्या निमंत्रण पत्रिकेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांचे नाव स्पष्टपणे समाविष्ट आहे. मात्र आमदार रवी राणा यांनी प्रसिद्ध केलेल्या स्वतंत्र निमंत्रण पत्रिकेत खासदार बळवंत वानखडे तसेच विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे-पाटील यांची नावेच वगळण्यात आल्याचा आरोप होत आहे.विशेष म्हणजे, निमंत्रण पत्रिकेत स्थानिक नगरसेवकांची नावे मात्र ठळकपणे देण्यात आली आहेत.
- १ सप्टेंबरपर्यंत टीईटी उत्तीर्ण असण्याची अट बेकायदेशीर असल्याचं म्हणत १४ मे २०२६ चे परिपत्रक रद्द केलेत...
- पदोन्नती प्रक्रिया सुरू होताना टीईटी पात्रता असणे हाच निकष असल्याचं मत
पाकिस्तानातील कुख्यात गुंडांच्या सोशल मीडिया नेटवर्कशी संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) राज्यभर मोठी कारवाई केली आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये छापे टाकून तब्बल ११२ तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तरुणांचाही समावेश आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, कारवाईबाबत एटीएसकडून कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे.
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखीचे आज सकाळी पंढरपूर कडे जाताना पुण्यातून सासवड कडे प्रस्थान झाल आहे.
काल आळंदीहून सोहळा निघाल्या नंतर दोन दिवस माऊलींची पालखी ही पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला होती. त्यानंतर आज सकाळी सहा वाजता माऊलीच्या पालखीने सासवडच्या दिशेने प्रस्थान केल आहे. टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात हजारो वारकरी भाविक माऊलीच्या आषाढी वारी मध्ये सहभागी झाले आहेत. माऊलींची पालखी पुण्यातून हडपसर मध्ये दाखल होणार असून त्यानंतर माऊलींची पालखी अवघड दिवे घाट मार्गे झेंडेवाडी या ठिकाणी दाखल होईल आणि तेथील विसावा उरकून सोपान काकांची नगरी सासवड येथे माऊली मुक्कामी असतील...
मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका रायगडच्या पेणमधील ग्रामीण भागातील गणेश मूर्ती उद्योगाला बसला आहे. पुराच्या पाण्यात मूर्ती, गणेश मुर्ती बनवण्याच साहित्य भिजल्याने मूर्तिकाराना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. कर्ज कसं फेडायचं याबरोबरच गणेशभक्तांची मागणी कशी पूर्ण करायची या विवंचनेत मूर्तिकार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे मोशी येथील दुर्घटनेबाबतचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेत सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले. यावेळी प्रशासन बचावाचे काम आज रात्री पूर्ण करेल, अशी माहिती आयुक्तांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आली.
मोशी येथील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. याशिवाय, दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे 100 टन कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी व्यवस्था उभारण्याबाबतही प्रशासनाला आवश्यक निर्देश यावेळी त्यांनी दिले.
यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.