Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: लोणार सरोवराच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ; जैवविविधतेसह प्राचीन मंदिरांना धोका

Marathi Breaking Live Headlines Updates: राज्यात गणेशोत्सव, मनोज जरांगेंचं उपोषण मागे, शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

पिसाळलेल्या कुत्र्याचा अनेकाना चावा.. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने अनेकजण जखमी झाले आहेत.. जखमींमध्ये लहान मुलांसह युवक, महिला आणि वयोवृद्धांचा समावेश आहे.. सात जखमींना उपचारासाठी अहिल्यानगर येथे पाठवण्यात आले आहे.. पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्याचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पुण्यात सणासुदीच्या काळात ‘एफडीए’ची कारवाई, ५६ लाखांचा अन्नसाठा जप्त

पुणे विभागातील १२ आस्थापनांवर छापे

प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्याप्रकरणी १४ ठिकाणी कारवाई करून सुमारे २० लाख २६ हजार रुपयांचा साठा जप्त

पुणे विभागात १० ते १५ सप्टेंबरदरम्यान ही कारवाई करण्यात आली

पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्येही तपासणी

सणासुदीच्या काळात खवा, मावा, स्वीट, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर अन्नपदार्थांची मागणी वाढते

या काळात भेसळयुक्त अन्नपदार्थ ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे अन्नपदार्थांची खरेदी करताना ग्राहकांनी लेबल, उत्पादनाची तारीख आणि इतर माहिती तपासावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे

राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बाबत मात्र अद्याप अस्पष्टता

एमपीएससी परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलण्याचा निर्णय

मात्र, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६चे पेपर नव्याने सेट करण्याच्या मागणीबाबत आयोगाने अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही

त्यामुळे मुख्य परीक्षा पुढे ढकलून नव्या प्रश्नपत्रिकांसह परीक्षा घ्यावी, ही विद्यार्थ्यांची मागणी कायम

बापट शिकून विद्यानंद झाले तसं आम्ही शिकून डी जे बनलो, पोटावर पाय देऊ नका

पुण्यात बुधवारी लाईट, साउंड असोसिएशन तर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे प्रशासनाकडून सहकार्याची आणि इतर बाबींबाबत मागण्या करण्यात आल्या. या मोर्चा मध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक साउंड व्यवसायिक आणि डी जे ऑपरेटर सहभागी झाले होते. यातील एका डी जे ऑपरेटर ने प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बापट शिकून विद्यानंद झाले, आम्ही सुद्धा कोर्स करून डी जे झालो आहोत, आम्ही सुद्धा कष्ट केले आहेत. आमच्या पोटावर पाय देऊ नका, आमच्यावर अन्याय करू नका, प्रशासनाला विनंती आहे."

बल्क ड्रग्ज प्रकल्प माणगावमध्ये होऊ देणार नाही; पालक मंत्री भरत गोगावले यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास

रायगडच्या माणगाव तालुक्यात बल्क ड्रग्ज प्रकल्प होऊ घातला आहे. रासायनीक कारखान्यांमुळे परिसराच होणार नुकसान लक्षात घेऊन बाधीत होणाऱ्या 21 गावातील ग्रामस्थांनी लढा पुकारला आहे. बल्क ड्रग्ज पार्क विरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर आज माणगावच्या कडापे येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आ. अनिकेत तटकरे देखील उपस्थित होते. माणगावमध्ये बल्क ड्रग्ज प्रकल्पा होणार नाही असा विश्वास गोगावले यांनी प्रकल्प बाधित ग्रामस्थांना दिला. बल्क ड्रग्ज प्रकल्प विरोधी आंदोलनासाठी पालक मंत्री पणाला लावावे लागले तरी मागे हटणार नाही अशी घोषणा मंत्री भरत गोगावले यांनी केली. उद्योग मंत्री उदय सामंत, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासोबत गणेशोत्सवानंतर बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याचा शब्द गोगावले यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्त आंदोलक ग्रामस्थांना दिला.

लोणार सरोवराच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ; जैवविविधतेसह प्राचीन मंदिरांना धोका

जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने सरोवराची जैवविविधता आणि परिसरातील प्राचीन मंदिरांवर संकट निर्माण झाले आहे. मागील वर्षी संबंधित विभागाने एका वर्षाच्या आत पाणी कमी करण्याचे आश्वासन दिले होते. राज्य वन्यजीव मंडळाची ना हरकत मिळाल्याचे विभागाकडून सांगण्यात येत असले तरी केंद्र सरकारच्या वन्यजीव मंडळाची एनओसी अद्याप प्रलंबित असल्याने पाणी काढण्याचे काम सुरू झालेले नाही. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने कमळजा माता मंदिरासह काही प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तसेच पाण्याचा pH स्तर व क्षारांचे गुणधर्म बदलल्याने लोणार सरोवरातील अल्कधर्मी जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. वाढत्या पाण्यामुळे जंगल क्षेत्रही कमी होत असून, वन्यप्राणी गावांकडे येऊन मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवरात्रोत्सव जवळ येत असल्याने कमळजा माता मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे तातडीने पाणी कमी करण्याची कार्यवाही करावी, अन्यथा विविध संघटनांकडून तीव्र आंदोलन आणि चक्काजाम करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या जलपातळीची गंभीर दखल उच्च न्यायालयानेही घेतली आहे. त्यामुळे शासन-प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

99 वर्षाची परंपरा जपणारे आझाद गणेश मंडळ.

अमरावती शहरातील आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ हे अमरावती शहरातील सर्वात जुने मंडळ आहे,या मंडळाला यावर्षी 99 वर्ष पूर्ण होत आहे,यावर्षी मंडळाने 'हारे का सहारा, बाबा श्याम हमारा' या संकल्पनेवर आधारित राजस्थानमधील जयपूर येथील प्रसिद्ध 'श्री खाटू श्याम बाबा' मंदिराची भव्य आणि नयनरम्य प्रतिकृती साकारली आहे.हा देखावा पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.हे मंडळ 1926 पासून कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रम ही मंडळी शहरामध्ये राबवत असते,या मंडळाचे पूर्वी नाव रॉयल गणेश मंडळ होते मात्र सुभाष चंद्र बोस यांचे आझाद हिंद फौजेचे सरसेनापती कॅप्टन शहानवाज हुसेन यांनी 15 ऑगस्ट 1948 साली या मंडळात ध्वजारोहण केलेले

गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे निलंबित - कर्तव्यात अक्षम्य निष्काळजीपणाचा ठपका - सार्वजनिक आरोग्य विभागाची मोठी कारवाई

गडचिरोलीतून मोठी बातमी, जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. पर्यवेक्षकीय जबाबदारीत अक्षम्य निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत शासनाने हा आदेश काढला आहे. १६ सप्टेंबरच्या आदेशानुसार त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं असून निलंबन काळात त्यांचं मुख्यालय गोंदिया जिल्हा रुग्णालय असणार आहे.

पाऊस लांबला,सोयाबीन पिक हातातुन गेल्याने शेतकऱ्यांने सोयाबीन पिकात सोडल्या म्हशी

धाराशिव जिल्ह्यात पावसाने दोन महीन्यापासुन दडी मारल्याने शेतकऱ्यांच नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाचा अक्षरशःपालापाचोळा झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप पुर्णपणे वाया गेला आहे.त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.धाराशिवच्या भुम मधील शेतकरी अमोल माळी यांनी सोयाबीन पिकातुन हाती काहीच येणार नसल्यामुळे आपल्या उभ्या सोयाबीन पिकात म्हशी सोडल्या आहेत,आता सरकारनेच काही तयी मदत करावी अशी मागणी शेतकरी माळी यांनी केलीय.

यवतमाळमध्ये मतदानापूर्वीच महाविकास आघाडीला झटका

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला मोठा झटका बसला असून काँग्रेसचे प्रफुल मानकर आणि श्रीनिवास नालमवार या दोघांचे अर्ज बाद झाले आहेत तर युतीच्या उमेदवारांविरोधात असलेले तीन आक्षेप फेटाळण्यात आले आहे महाविकास आघाडीला बसलेल्या धक्क्यामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलवरील करावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Sindhudurg : कोकणच्या किनाऱ्यावरील 'काशी'! 'या' ठिकाणाचं सौंदर्य पाहून भान हरपेल

Kitchen Hacks : मिक्सरची पाती बोथट झाली आहेत? 'ही' एक ट्रिक वापरून घरच्या घरी काढा धार, पैसे आणि वेळ वाचेल

Maharashtra Weather : राज्यात उकाडा वाढला, पण या ९ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे; फडणवीस सरकारला ९० दिवसांचा 'अल्टीमेटम'

SCROLL FOR NEXT