उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असून बारामतीत पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार आज राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेणार आहेत या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनिता पवार या सहा एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत
नांदेड शहरात गँग वॉर
दोन गटातील तिघांचा मृत्यू
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीमार्ट जवळ मध्यरात्री घडला थरार.
दोघांचा जागेवर तर एकाचा रूग्णालयात मृत्यू.गुंडाच्या दोन गँग मध्ये झाला राडा
भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातचा अद्यापही लागेना शोध
SIT, नाशिक आणि शिर्डी पोलीसांची पथके कल्पनाच्या मागावर
कल्पनाचे नातेवाईक आणि मैत्रिणींचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती
कल्पना विरोधात पोलीसांनी लूक आऊट नोटीसही केलीय जारी
,लातूरच्या उदगीर शहरातील जळकोट रोड परिसरात चार ते पाच टवाळखोरांनी हातात कोयता घेऊन, दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला आहे, शहरातील जळकोट रोड हा अतिशय वरदळीचा परिसर आहे आणि या परिसरात रात्री दुचाकीवरून आलेल्या काही तरुणांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत, जोरदार गोंधळ घातला आहे, तर कोयता घेऊन काही जणांना जखमी देखील केल्याची माहिती समोर येते आहे .
वर्धा जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी यंदाच्या नवोदय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता सहावीच्या निवड चाचणीत 80 पैकी तब्बल 28 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधील आहेत. विशेष म्हणजे, हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत जांगोणा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील 9 विद्यार्थ्यांची निवड होऊन शाळेने विक्रम नोंदवला आहे. या यशामुळे जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत होत असलेली वाढ पुन्हा अधोरेखित झाली आहे.
माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून सुरू झालेला वाद मिटला असून गावातील वातावरण निवळले आहे.
दरम्यान माढा सोलापूर मार्गावर सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आल्याने रस्ता खुला झाला आहे. लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. आज दिवसभरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थलांतरित करून योग्या त्या ठिकाणी बसवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॅरिकेटिंग लावून सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.
मुरबाड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळ पिकांचं मोठं नुकसान झालय. आदिवासी विभागातील टोकावडे, मोरोशी, शिरोशी, आणि धसई विभागात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, चिकूसह इतर फळबागांमधील फळं गळून पडली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. भाजीपाला पिकांचं नुकसान आणि फळबागांना फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं.आर्थिक नुकसान झालय. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाकडे केलीय.
पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीच मोठ नुकसान
जवळपास सव्वा दोन हजार हेक्टर वरील पिकांच झाल नुकसान
१२७ गावातील साडे चार हजार शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला आहे.
जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या पावसात मोठ नुकसान
- नागपुरात व्यावसायिकाचा निर्वस्त्र मृतदेह सापडला, वाडीच्या लावा परिसरात खळबळ उडाली
- खडगाव मार्गावरील झुडपांत मृतदेह आढळला
- सुचित भोजापुरे (४४) अशी मृतकाची ओळख पटल्यानंतर खळबळ, ते मशिनरी स्पेअर पार्ट्स व्यवसायिक होते.
- डोक्यावर जड वस्तूने वार केल्याचा संशय निर्घृण हत्येची शक्यता
- निर्वस्त्र अवस्थेमुळे ओळख पटवणे कठीण सुरुवातीला पोलिसांची अडचण गेली..
- घटनास्थळी ठोस पुरावे नाहीत वाहनाचेही कोणतेही चिन्ह सापडले नाही
- रात्रीपासून बेपत्ता होता, वाडी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद
- मृतदेहाचे छायाचित्र दाखवत ओळख पटली कुटुंबीयांचा आक्रोश
- वडिलांचा थेट खुनाचा आरोप पोलिसांकडे तक्रार दाखल,
भंडाऱ्यात रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात जोरदार तर, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस बरसला. मागील दोन दिवसात पडलेल्या पावसानं जिल्ह्यातील मका, भाजीपाला आणि आंबा उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहे. रात्रीच्या पावसानं शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. अवकाळी पावसात रात्रीच्या सुमारास अनेक भागातील काहीकाळ वीज पुरवठा खंडीत झाला होता.
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून नवीन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारला.
राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली तर सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासमोर सोलापूर जिल्ह्यातील विविध विकास कामांचा प्रगतीपथावर नेण्याचं काम करावं लागेल. पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात विशेष लक्ष घालावे लागणार आहे असे मत मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले.
विदर्भातील वाघ आता पुन्हा सह्याद्रीत फोडणार डरकाळी, 5 वाघांच्या स्थलांतराची तयारी
विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने आता वन विभागाने हालचाली सुरू केले आहेत
यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर पाठविलेले तीन वाघ सह्याद्रीच्या वातावरणात रमल्यानंतर आता पुन्हा विदर्भातून पाच वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे...
यासाठी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची परवानगी मिळाली आहे...
विदर्भात पेंच आणि ताडोबा वाघांची संख्या झपाट्याने वाढल्याने वर्चस्वासाठी वाघांमध्ये झुंज होतात, तसेच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वाघांना टप्प्याटप्प्याने पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या जंगलात सोडले जाणार...
भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल
कांदा व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
६० लाखांची जागा वृद्धाश्रमाच्या नावे २२ लाख २५ हजार इतक्या कवडीमोल भावात खरेदी करून प्लॉट विक्री व्यवसायात गुंतवणुकीचा आमिष दाखवून फसवणूक
वृद्धाश्रमाच्या जागेऐवजी चांगल्या लोकेशनवर जागा घेऊन देण्यासाठी ८५ लाख रुपये घेत जागा दिलीच नसल्याची तक्रार
पैसे आणि जागेसाठी तगादा लावू नकोस, अन्यथा तुझ्यावर देवाचा खूप होईल, असा शाप देत कांदा व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचं उघड
भोंदू खरातविरोधात आत्तापर्यंत १२ गुन्हे दाखल, १२ पैकी ८ लैंगिक शोषणाचे तर ४ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात गंजेवाडी येथे शेतकऱ्याच्या 17 शेळ्यांचा संशयास्पद मृत्यू
गंजेवाडी येथील शेतकरी महावीर गंजे यांचे लाखो रुपयांचे नुकसान
सोलार कंपनीच्या लोकांनी शेळ्या मारल्याचा शेतकरी महावीर गंजे यांचा आरोप
शेतकरी महावीर गंजे आणि सोलार कंपनीमध्ये गेली एक वर्षापासून सुरु आहे भांडण
मात्र हिंस्र प्राण्यांनी हल्ला केला असल्याचा वन विभागाचा दावा
शेतकरी महावीर गंजे यांची प्रशासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान केला जातो मात्र गेल्या तीन वर्षांपासून शिक्षक दिन पुरस्कार वितरण सोहळा विविध कारणाने टळत आहे,आता शिक्षण विभागाला पुरस्कार वितरण सोहळा घेण्याचा मुहूर्त मिळाला आहे येत्या सोमवारी यवतमाळ जिल्हा परिषद सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षकांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
दहिसर–मिरा-भाईंदर मेट्रो ९ अ मार्गावरील पहिल्या स्थानकाच्या नावावरून स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी
मेट्रो ९ अ स्थानकाला ‘पांडुरंग वाडी’ असे नाव देण्यात आल्यामुळे स्थानिकांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
पांडुरंगवाडी हे एक पेणकर पाड्याचा अंश आहे त्यामुळे पेणकर पाडा असेच नाव देण्यात यावे स्थानिक आग्रही
वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने नागरिकांनी थेट स्थानकावर जाऊन नाव बदलून आंदोलन केले.
‘पांडुरंग वाडी’ या नावावर ‘पेनकरपाडा’चे पोस्टर लावून स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.
तसेच ६ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये खरात पार्ट २ उघडकीस आल्यानं खळबळ
NGO संस्था चालकाकडून १२१ महिलांचं लैंगिक शोषण, फिर्यादीत निघाला आरोपी
उद्योजक आणि NGO संस्था चालकाकडून खंडणी प्रकरणात उद्योजकावरही गुन्हा दाखल
संशयित आरोपी रवींद्र एरंडेला पोलिसांकडून अटक
टॅबमधील ८१ व्हिडिओनी फाडला एरंडेचा बुरखा
४ मोबाईल, २ पेनड्राईव्ह, १ मेमरी कार्ड जप्त
गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून तसंच तुझं भविष्य उज्वल करतो सांगत शोषण केल्याचा आरोप
नाशिक आणि इगतपुरीतील हॉटेलमध्ये अत्याचार करून गुपचूप चित्रीकरण
अश्लील व्हिडिओ ‘ब्लू फिल्म’ स्वरूपात पॉर्न साईट्स अथवा ब्ल्यू फिल्म बनवणाऱ्यांना विक्रीचा देखील संशय
बलॅकमेलिंगद्वारे पैशांची मागणी झाली का? याबाबत देखील तपास सुरू
अंजनगाव खेलोबा येथे नानदेव फरांदे महाराज यांचे अन्न त्याग आंदोलन मागे....
खेलोबा मंदिर परिसरातून पुतळा इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय झाल्या नंतर आंदोलन मागे...
नानदेव फरांदे यांचे तीन दिवसांपासून सुरू होते अन्न त्याग आंदोलन....
गावातील तणाव निवळला...
- कार थेट पाण्याने भरलेल्या विहीरीत कोसळली
- इंदोरे गावचे सुनिल दरगुडे कुटुंब आणि त्यांच्या नात्यातील अशा एकूण 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू
- एका खाजगी क्लासचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आटोपून घरी परतत असतांना घडली घटना
- चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती, दिंडोरी पोलीसांकडून अधिक तपास सुरु
सांगलीच्या जत तालुक्याला वादळी वाऱ्याचा गारपिटीचा फटका बसलाय अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्याने शेतीचा मोठा नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतीची भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे खंडनाळ,संख,मुचंडी, रावळगुंडवाडी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची आमदार पडळकर यांनी शासकीय अधिकाऱ्यांसह बांधावर जाऊन पाहणी केली आहे.
सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या भिलवडी परिसरामध्ये अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात बसलाय काढलेल्या द्राक्षबागांवर पावसाचा अवकाळी पावसाचा कहर झाल्याने द्राक्षबाग शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्याने भिलवडी,माळवाडी ,सुखवाडी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या द्राक्ष बागांवर या नैसर्गिक आपत्तीने घाला घातला असून, अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.