माथेरानमधील मलनिःसारण प्रकल्पाच्या चेंबरचे झाकण तुटून घोडा जखमी झाला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. सुदैवाने या घोड्यावरून प्रवास करणारे पर्यटक बचावले आहेत. हा घोडा दस्तुरी ते माथेरान असा प्रवास करत असताना त्याचा पाय चेंबरच्या झाकणावर पडला आणि हे झाकण तुटले. घोड्याचा पाय त्या चेंबरमध्ये अडकून पायाला दुखापत झाली. या घटनेमुळे मलनि:सारण प्रकल्पाच्या कामाबाबत शंका व्यक्त होत आहे.
सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, एल निनोच्या व आय.ओ.डी.च्या प्रभावामुळे यावर्षीचा उन्हाळा लांबणार असल्याने व पर्जन्यमानामध्ये घट होणार असलेने धरणातील उपलब्ध पाणी साठयाचा पावसाळा सुरु होईपर्यंत काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. परिणामी, काळम्मावाडी व शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेसाठी होणारा दैनंदिन पाणी उपसा मर्यादित ठेवणे आवश्यक झाले आहे. उपलब्ध पाणी साठा पावसाळा सुरु होईपर्यंत पुरवण्यासाठी महानगरपालिकेने शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, 30 एप्रिल 2026 पासून शहरातील विविध भागांमध्ये एक दिवस आड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसासाठी मदतीचा निर्णय
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांकडून निधी वितरणासाठी शासन निर्णय जारी
सातारा जिल्ह्यासाठी ६० लाख ४९ हजार रुपये मंजूर
शेतकरी मदतीचा निधी बँक खात्यातून थेट कर्जासाठी वळता करू नका
शासन आदेशातून बँकांना महसूलमंत्री बावनकुळेंची तंबी
बीड जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतींमधील 31 रिक्त जागांसाठी काल मतदान पार पडली आहे. यामध्ये 12 सरपंच आणि 19 सदस्य पदांचा समावेश आहे बीड जिल्ह्यातील या ग्रामपंचायतींचा निकाल आज हाती येणार यामध्ये विशेष म्हणजे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मास्साजोग मध्ये देखील पोटनिवडणूक झाली असून या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे
बीडच्या परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानक परिसरातून उत्तर प्रदेश राज्यातील एक १२ ते १३ वर्ष वयोगटाची मुलगी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रेल्वे पोलीस प्रशासनाकडून तिचा शोध घेतला जात आहे.
बुलढाणा येथे छत्रपती शिवरायांबाबत कथित अवमानकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार नोंदविण्यात आली आहे. आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी फिर्यादी म्हणून लेखी तक्रार दाखल केली आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज धुळे शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा गोदा ते नर्मदा या यात्रेनिमित्त धुळ्यात आले असता धुळेकरांनी या यात्रेचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे,
राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोदा ते नर्मदा जलयात्रा सुरू म्हणत मंत्री विखे पाटील यांनी या यात्रेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्याचा प्रयत्न असल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे,
नाशिक अमरावतीनंतर आता अकोला 'लव्ह जिहाद'च्या घटनेने हादरलाय.. प्रेमाच्या नावाखाली विवाहित मुस्लिम तरुणाकडून हिंदू मुलीचं अपहरण करीत 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय. अखेर खदान पोलिसांकडून तरुणीची सुटका करण्यात आलीय. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.