Womens Physical Abuse Case Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Crime: राज्यात दिवसाला ११६ महिलांवर अत्याचार, NCRB च्या आकडेवारीतून विदारक चित्र आलं समोर

Womens Physical Abuse Case: नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने नुकताच राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांची धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. राज्यात दिवसाला ११६ महिलांवर अत्याचार होत आहेत.

Priya More

राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. महिलांवर लैंगिक अत्याचार, बलात्कार, विनयभंग या बातम्या वारंवार समोर येत आहेत. महाराष्ट्रात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही असं दिसत आहे. यातच नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने नुकताच राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांची धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. राज्यात दिवसाला ११६ महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि आता सत्तेत असलेल्या महायुती सरकारच्या काळामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांची संख्या सारखीच असल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे.

राज्यामध्ये २०१९ पासून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी आणि आता सत्तेत असलेल्या महायुतीच्या सरकारमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या दैनंदिन घटनांची संख्या सारखीच आहे. दोन्ही सरकारमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसाला सरासरी १२६ घडल्या. कोरोना काळामध्ये म्हणजे २०२१ मध्ये राज्यात दिवसाला १०९ महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. जानेवारी ते जून २०२२ या कालावधीमध्ये दिवसाला १२६ घटना घडल्या होत्या. त्यावेळी होती ती संख्या आज देखील तशीच आहे.

राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये १८ वर्षांवरील मुलींना जास्त लक्ष्य केले जात आहे. २०२२ मध्ये आघाडी सरकारच्या काळामध्ये १,३१७ तर २०२३ मध्ये १,२०८ गुन्हे दाखल झाले होते. महिलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांची संख्या २०२२ मध्ये ११६ होती. तर २०२३ मध्ये ही संख्या ७९ इतकी झाली. या गुन्ह्यांमधील आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली जात असली तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही कमी व्हायचे नाव घेत नाहीत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आकडेवारी -

२०२० - राज्यात ३१,७०१ महिलांवर अत्याचार झाले. दिवसाला ८८ घटना घडत होत्या.

२०२१ - राज्यात ३९,२६६ महिलांवर अत्याचार झाले. दिवसाला १०९ घटना घडत होत्या.

२०२२ - जानेवारी ते जून २०२२ या मविआच्या काळात राज्यात २२,८४३ महिलांवर अत्याचार झाले. दिवसाला १२६ घटना घडत होत्या.

महायुती सरकारच्या काळातील आकडेवारी -

२०२२ - ३० जूनला राज्यात महायुतीचे सरकार आले. जुलै ते डिसेंबर २०२२ या सहा महिन्यांच्या काळामध्ये २०,८३० घटना घडल्या. दिवसाला ११६ घटना घडत होत्या.

२०२३ - या वर्षामध्ये देखील महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी झाल्या नाही. या वर्षातही दिवसाला १२६ अत्याचाराच्या घटना घडल्या. महत्वाचे म्हणजे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये २०२१ पासून वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Tourism: उल्हासनगरपासून अवघ्या ८४ किमी अंतरार वसलंय 'हे' शांत आणि थंडगार ठिकाण; आजच प्लान करा

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनरनं २० गाड्यांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू, VIDEO समोर

Shocking : लग्न करण्यास नकार दिल्याने हत्या, प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरला विष देऊन संपवलं

Periods and Shravan : मासिक पाळीत श्रावणाचा उपवास करावा की नाही?, जाणून घ्या वैज्ञानिक कारणे

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT