सूरज सावंत
काँग्रेसमध्ये (Congress) नेमकं सुरू काय आहे? एकीकडे कोंग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांचा राजीनामा घ्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, दुसरीकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) महापारेषण कर्मचाऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यास त्याच्याच पक्षा़चे उर्जा मंत्री नितीन राऊत (NItin Raut) यांच्याकडे राजीनामा मागू अशी भाषा करत असल्याने काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण पून्हा एकदा समोर आले आहे.
हे देखील पहा-
काँगेसमधील अंतर्गत वाद पुन्हा समोर आले आहे. नागपूर जिल्हाबँक घोटाळाप्रकरणी काँग्रेसनेते माजी आमदार अशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहीत पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. सुनिल केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असतांना खासगी दलालांमार्फत सरकारी रोख्यांमध्ये गुंतवल्याचा गंभीर आरोप अशिष देशमुख यांनी केला आहे. मंत्री सुनील केदार नागपूर जिल्हाबँकेचे अध्यक्ष असताना घोटाळा झाला आणि जनसामान्यांचे, शेतकऱ्यांच्या १५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तेव्हा झाला होता. आज १९ वर्ष झाल्यानंतर ही न्यायालयीन प्रक्रीया अंतिम टप्यावर आली आहे. सुनील केदार हे काँग्रेसचे आमदार आणि मंत्री आहेत. म्हणून या सर्व प्रकारावर पडदा पडेल का?, अशी जनसामान्यांची भावना मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. असे पत्रच आशिष देशमुख यांनी सोशल मिडियावर पोस्ट केलं आहे.
तर दुसरीकडे महापारेषण कर्मचाऱ्यांच्या विविध मागणींसाठी मंत्र्यांची भेट घेऊन सुद्धा काम होत नसल्याने भाई जगतापांनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासोबत महापारेषण कर्मचार्याच्या विविध मागण्यांसाठी झूम द्वारे दोन बैठका झाल्या, मात्र मंत्र्याचं प्रशासन ऐकत नाही, म्हणजे प्रशासन माजलेलं आहे कामत आडमुठेपणा आणत आहे. अशा अधिकार्यांवर कारवाई करण्याचे अधिकार मंत्र्यांना असताना ते जर काही करत नसतील. तर त्यांच्याकडे राजीनामा आम्ही मागू. अशी भुमिका आमदार भाई जगताप यांनी मांडली आहे.
काँग्रेसमधील या गटबाजीबाबत विरोधकांनीही लक्ष केंद्रीत केले. यशोमती ठाकूर म्हणतात अजित पवार ऐकत नाही. काँग्रेसचेच नेते स्वत:च्या आमदाराचा राजीनामा मागत आहेत. यावरून हे सरकार गुळाच्या ढेपेला ज्या प्रमाणे मुंगळे चिकटलेले असतात. त्या प्रमाणे चिकटलेले असल्याची टिका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्यात येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा पार्श्वभूमिवर काँग्रेसला अंतर्गत गठबाजीमुळे मोठा फटका बसू शकतो असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
Edited By - Anuradha
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.