mahayuti  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: कन्फर्म! विधानसभेआधीच महायुतीला जबरा झटका, सत्तानाट्यातील महत्वाच्या मोहऱ्यानं मांडली वेगळी चूल

Bharat Jadhav

महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणारी हाती आलीय. राज्यातील सत्ता स्थापनेमधील महत्त्वाचा भिडू असलेल्या बच्चू कडूंनी सत्तेतून बाहेर पडत वेगळी चूल मांडलीय. संभाजी राजे छत्रपती आणि राजू शेट्टी यांनासोबत घेत बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. आज तिसरी आघाडीची पुण्यात बैठक झाली. परिवर्तन महाशक्ती या नावाने बच्चू कडू यांनी राज्यात तिसरी आघाडी स्थापन केली.

परिवर्तन महाशक्ती नावाने ते विधानसभा निवडणुकीत सामोरे जाणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिलीय. या आघाडीचा पहिला मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे. ज्यांना यात यायचं असेल तर त्यांनी २६ तारखेला संभाजीनगरला सामील व्हावे, असं आवाहन बच्चू कडू यांनी यावेळी केलं. पुण्यातील बैठकीत तिसऱ्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. त्यावेळी तुम्ही महायुतीतून बाहेर पडत आहात का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. मी महायुती बाहेर पडलो आहे हे स्टॅम्प पेपर वर लिहून देऊ का? असं उत्तर त्यांनी दिलं.

या तिसऱ्या आघाडीत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि संभाजी राजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा समावेश असणार आहे. या तिसऱ्या आघाडीमुळे महायुतीसोबत महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार आहे.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बच्चू कडू यांनीच तिसरी आघाडी बनवून महायुतीविरोधात दंड थोपटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बच्चू कडू यांनी राज्यातील सत्ता बदलाच्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

भिडूने बदलली बाजू

अपना भिडू बच्चू कडू अशा घोषणा अमरावतीमध्ये सर्रास ऐकायला मिळतील. बच्चू कडू यांचे समर्थक या घोषणेने त्यांचा प्रचार करतात. राजकारणात बच्चू कडूची भूमिकाही तशीच राहिली आहे. राज्यातील सत्ता नाट्यात बच्चू कडू यांची मोठी भूमिका होती.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारला होता त्यावेळी बच्चू कडू सु्द्धा त्यांच्यासोबत दिसले होते. बच्चू कडू महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर त्यांनी मंत्रीपद सोडत शिंदेंच्या गटात सामील झाले होते. त्यांच्यासोबत त्याचे आमदारदेखील महायुतीत सामील झाले होते.

लोकसभा निवडणुकीपासून नाराज

दरम्यान महायुतीत सामील झाल्यानंतर मंत्रीपद मिळत नसल्याने बच्चू कडू नाराज होते. त्यामुळे ते वेळोवेळी सरकारला घरचा आहेर देत. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना अमरावतीची जागा हवी होती. परंतु भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली त्यामुळे त्यांची नाराजी वाढली होती. त्यानंतर ते लवकरच महायुतीला रामराम करतील असं म्हटलं जात होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT