Latur Water Crisis:  Saamtv
महाराष्ट्र

Latur Water Crisis: लातूर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट! २५ गावात टँकरने पाणीपुरवठा; नागरिक बेहाल

Latur Water Crisis: लातूर जिल्ह्यामध्ये मात्र पाणी टंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

Gangappa Pujari

संदिप भोसले, लातूर, ता. १७ मे २०२४

गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी सरी कोसळून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु लातूर जिल्ह्यामध्ये मात्र पाणी टंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळीने धुमाकूळ घातल्याचे दिसत आहे. तर लातूर जिल्ह्यात मात्र दिवसेंदिवस पाणीटंचाई आणि दुष्काळाची छाया अधिक गडद होत असल्याचे चित्र दिसत आहे. लातुर जिल्ह्यातील तब्बल 25 गावांना टँकर तसेच खाजगी बोरवेल, व विहीर,अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पाणी टंचाईमुळे नागरिकांची झोप उडाली असून चातकासारखी पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागत आहे. तसेच रात्री बे-रात्री उठून पाणी भरावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत असल्याची विदारक परिस्थिती जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे.

दरम्यान, अमरावतीमध्येही दुष्काळाजी दाहकता जाणवत आहे. जिल्ह्यातील मेळघाटातील कुपोषणानंतर खडीमल गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देशपातळीवर पोहोचला होता. पाणीपुरवठ्याच्या योजना निकामी ठरल्या असताना भर उन्हात आदिवासी महिलांना सर्व कामे सोडून हंडा भर पाण्यासाठी टँकरची चातकासारखी वाट पाहावी लागते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरण; राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून ३ सदस्यीय संयुक्त चौकशी समितीची नियुक्ती

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

Ambernath Tourism : पावसाच्या सरींमध्ये खुलते अंबरनाथचं सौंदर्य, 'ही' ठिकाणं वीकेंडला पाहायलाच हवीत

Pune : पाणीटंचाईचे संकट टळले! खडकवासला धरण शंभर टक्के भरले, इतर धरणांमध्ये किती टक्के साठा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT