भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीचं दोन दिवस संवर्धन करण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक 14 आणि 15 एप्रिल रोजी देवीचं दर्शन बंद राहणार आहे. भाविकांना दर्शनासाठी पितळी उंबऱ्याच्या बाहेर कलश आणि उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ही माहिती दिली आहे.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची झीज झाल्याने तातडीने संवर्धन करण्याची गरज असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी दिला आहे. मूर्ती संवर्धनासंबंधीचा दावा दिवाणी न्यायाधीश यांच्यासमोर सुरू आहे. न्यायालयीन आदेशानंतर पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर.एस. त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी 14 आणि 15 मार्च रोजी केलेल्या पाहणीचा अहवाल न्यायालयात सादर केला होता.
अहवालानुसार भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने करवीर निवासी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन दिनांक 14 आणि 15 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. यादरम्यान भाविकांना देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी पितळी उंबऱ्याच्या बाहेरून कलश आणि उत्सव मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे.
अंबाबाईच्या मूर्तीची गळ्या खालच्या भागाची झीज झाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या संवर्धनाच्या पाहणीसाठी न्यायालयाकडून तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. या समितीकडून न्यायालयात ८ पानांचा अहवाल सादर करण्यात आलाय. यात ही धक्कादायक माहिती देण्यात आलीय. मूर्तीची झालेली झीज २०१५ साली झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची झीजमुळे झाल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.