Kishore Jorgewar News, Political Crisis in Maharashtra
Kishore Jorgewar News, Political Crisis in Maharashtra saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्रात बदल घडेल असे वाटत नाही'

संजय तुमराम

चंद्रपूर : विधान परिषद निवडणुकीत सत्ताधा-यांना (mva) भारतीय जनता पक्षाने (bjp) दणका दिल्यानंतर राज्यात राजकीय भुकंप हाेणार असे चित्र आज (मंगळवार) सकाळपासून निर्माण झाले आहे. शिवसेनेचे (shivsena) काही आमदारांचा फाेन लागत नसल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (kishore jorgewar) यांनी चापलुसांना संधी दिल्याने असे निकाल लागले असे वक्तव्य केल्याने राजकीय मंडळींच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. (kishore jorewar latest marathi news)

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी विधान परिषद निवडणूक आणि एकनाथ शिंदे नॉट रिचेबल प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषद निवडणुकांचे निकाल विद्यमान राजकीय पक्षांचे डोळे उघडणारे असल्याचे मत त्यांनी मांडले. राज्यसभा निवडणुकीत अपक्षांवर घोडेबाजाराचा आरोप झाल्याची आठवण त्यांनी करून दिली. (Political Crisis in Maharashtra)

आजच्या ताज्या निकालात मात्र प्रस्थापित राजकीय पक्षांचे आमदार नाराज असल्याचे सिद्ध झाल्याचे मत आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केले. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून चापलुसांना संधी दिल्याने अशी स्थिती निर्माण होते, असा टोलाही आमदार जोरगेवार यांनी लगावला आहे. नव्या घडामोडींमुळे राज्य सरकारमध्ये काही बदल घडेल, असे वाटत नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

SCROLL FOR NEXT