mns, khed, ratnagiri, police, arrest, vaubhav khedekar Saam Tv
महाराष्ट्र

MNS News : 'मनसे' च्या पदाधिका-यांना अटक, न्यायालयानं सुनावली पाेलिस काेठडी

पाेलिस वैभव खेडेकर यांचा शाेध घेताहेत.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश काेळी

MNS News : रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील खेड येथे मनसेच्या (mns) तीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाेलिसांनी नुकतीच अटक केली. या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. रस्ते आस्थापना जिल्हा संघटक दादू नांदगावकर, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष प्रसाद शेट्ये व केदार वणंजू अशी पाेलिस काेठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. (Ratnagiri Latest Marathi News)

मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या पाठोपाठ आता मनसेच्या कार्यकर्त्यांच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे. गणेशोत्सवातील लॉटरी घोटाळा प्रकरणात मनसेच्या तीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खेड पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

रस्ते आस्थापना जिल्हा संघटक मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख प्रसाद शेट्ये व केदार वणंजू या मनसेच्या (mns) तिघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता या तिघांनाही तीन दिवसांची पोलीस (police) कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज (शुक्रवार) वैभव खेडेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून वैभव खेडेकर हे नॉट रीचेबल असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीत विसंवाद? तटकरे आणि गर्जे यांच्यात शा‍ब्दिक चकमक, VIDEO

Bank Holiday: बँका शनिवारी सुरु असणार की बंद? वाचा RBIची सुट्ट्यांची यादी

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, आधी पोटच्या मुलीचा गळा दाबला, नंतर ६ वर्षांच्या मुलाला घेऊन विहिरीत उडी मारली

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा फटका; १७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Chhatrapati Shivaji Maharaj forts: छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर भगवान शिवाचं मंदिर का होतं?

SCROLL FOR NEXT