Kerala Governor News
Kerala Governor News  saam tv
महाराष्ट्र

जेव्हा गुलामी होती, तेव्हा सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकले; केरळच्या राज्यपालांचं मोठं विधान

साम टिव्ही ब्युरो

मोबिन खान

Kerala Governor News : 'जेव्हा गुलामी होती, तेव्हा सु्द्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकले होते. हीच भारताची संस्कृती आहे. भारताचा नागरिक आजही स्वतंत्र आत्मा आहे. येथे कोणीच तोंड बंद करू शकत नाही, असे मत केरळचे (Kerala) राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (arif mohammad khan) यांनी व्यक्त केले. (kerala governor arif mohammad khan big statement freedom of expression)

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. खान म्हणाले, 'एखाद्या मुक्या माणसाला खीर दिल्यावर कशी लागली हे विचारा. त्याच्या ज्या भावना असतील तसं मला दर्शन घेतल्यावर वाटत आहे'.

कट्टरपंथींवर भाष्य करताना म्हणाले, मी कधी कोणाविरुद्ध आवाज बुलंद केला नाही. भारताची संस्कृती कायम समन्वयाची आहे. आपली एकता निर्माण करणारी आपली संस्कृती आहे. भारतातील संतांनी कधी हे माझे विचार आहे, असं सांगितलं नाही. मूलभूत सिद्धांतावर जेव्हा धूळ येते, ती काढण्याचे काम संतांनी केलं आहे. साईबाबा या संस्कृतीचे महान प्रवक्ते राहिले आहेत'.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाविषयी भाष्य करताना राज्यपाल खान म्हणाले,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात जितका आनंद घेऊ, तितका कमी आहे. आपलं स्वातंत्र्य आणि संस्कृती मूल्यवान आहे. त्यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने सतत सजग राहिले पाहिजे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI Playing XI: आज अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार? LSG विरुद्ध अशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Buldhana: ज्वारी खरेदीच्या निकषामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप, नोंदणी कार्यालयात तुडुंब गर्दी

Bribe Case : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या ताब्यात; मजुरांचे पैसे काढण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

Benifits of Pomogranate Peel: डाळिंबाची साल कचरा समजून फेकून देताय का? जाणून घ्या आरोग्यादायी फायदे

Bhandara News: पिकविम्यात शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाई म्हणून मिळाले १०००, १२०० रुपये; बळीराजाचा संताप

SCROLL FOR NEXT