KDMC News Saam tv
महाराष्ट्र

KDMC News : रात्री स्थलांतर दिवसा पुन्हा टेकडीवर; घरांवर कारवाईबाबत महापालिकेचा इशारा

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : पावसामुळे कल्याण पूर्वेकडील कचोरे व नेतिवली टेकडी परिसरात दगड (Kalyan) कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील १४० कुटुंबांना स्थलांतरणाच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यांचे स्थलांतर करण्यात आले. त्यामधील काही कुटुंब रात्री स्थलांतर होतात. मात्र दिवसा पुन्हा तिथेच येऊन राहत असल्याचे निदर्शनास आले. (Breaking Marathi News)

कल्याण शहरातील नेतीवली आणि कचोरे टेकडीवरील दरड कोसळण्याच्या घटना दरवर्षी पावसाळ्यात घडतात. या दुर्घटनेत नागरिक जखमी होत असले, तरी दरवर्षी या टेकडीवरील झोपड्याची संख्या वाढतच आहे. या टेकडीवर दुर्घटना घडण्याची भीती यंदाही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने (KDMC) पावसाळ्यात जून महिन्यात नेतिवली कचोरी टेकडीवरील १४० रहिवाशांना स्थलांतर करण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या. ईर्षाळवाडी दरड दुर्घटनेनंतर कल्याण डोंबवली महापालिका खडबडून जागी झाली. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून या येथे चाळीस कुटुंबांना स्थलांतर करण्याचे काम हाती घेण्यात आले. यातील काही कुटुंबांचा स्थलांतरण करण्यात आलं असलं तरी काही नागरिक मात्र दिवसा पुन्हा याच ठिकाणी येऊन राहत असल्याचे निदर्शनास आले. 

या पार्श्वभूमीवर आज महापालिका (Dombivili) आयुक्त डीसीपी सचिन गुंजाळ यांनी या परिसराचे पाहणी केली. संबंधित नागरिकांना स्थलांतर करण्याबाबत फक्त सूचना देण्यात आलय. अन्यथा घरांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी महापालिका आयुक्तांनी दिला. तर महापालिकेच्या या भूमिकेचा स्थानिक नागरिकांनी विरोध केला. याआधी देखील या ठिकाणी दगड कोसळण्याचे अनेक घटना घडल्यात. याबाबत उपाययोजना करण्यासाठी महापालिकेकडे सातत्याने पत्र व्यवहार केला. मात्र महापालिका पावसाळा आल्यावर जागी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT