Kalicharan Maharaj Saam Tv
महाराष्ट्र

Kalicharan Maharaj News : कालीचरण महाराज पुन्हा बरळले; नथुराम गोडसेने गांधींबाबत जे केले ते योग्यच

Kalicharan Maharaj News : नथुराम गोडसे यांना कोटी कोटी प्रणाम आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

Kalicharan Maharaj News : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या कालीचरण महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नथुराम गोडसेने महात्मा गांधींबाबत जे केले ते बिल्कूल योग्य केले, असं गंभीर स्वरुपाचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता. नथुराम गोडसे यांना कोटी कोटी प्रणाम आहे. जितके नथुराम गोडसेंना वाचाल तेवढे तुम्ही त्यांचे भक्त व्हाल, असा दावाही कालीचरण महाराजांनी केला आहे.

याआधीही कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले होते. गांधीजींना शिवीगाळ करताना त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचं गुणगानही गायलं होत. कालीचरण महाराजांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद झाला होता. कालीचरण महाराजांच्या अटकेची मागणीही मोठ्या प्रमाणात केली जात होती. (Latest Marathi News)

राहुल गांधींवरील कारवाई योग्यच

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई योग्यच आहे. राहुल गांधींना त्यांच्या कर्माची फळे मिळाली आहेत. हिंदू लोक हे राहुल गांधींच्या व्होटर बँकचे शत्रू आहेत.

मात्र हिंदू आता शेळपट नाही राहिला. फालतू सेक्युलरिझम हिंदूंनी सोडून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नपूर्तीसाठी हिंदू एक होत आहे, असं वक्तव्य कालीचरण महाराजांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT