Water Level of Jayakwadi Dam Saam TV
महाराष्ट्र

Jayakwadi Dam Water Level : जायकवाडी धरणात सध्या किती टक्के पाणीसाठा? मराठवाड्याची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

Satish Daud

मराठवाड्याला पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असून अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरसह प्रमुख शहरांची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. येत्या १० दिवसांत जायकवाडी धरणाचा पाणीसाठा मृत साठ्यावर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे मराठवाड्याला आणखीच पाणीटंचाईच्या झळा बसण्याची दाट शक्यता आहे. जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहर, जालना, बीड, धाराशिव, परभणी शहराला पाणीपुरवठा केला जातो. तसेच वाळूज शहरातील अनेक उद्योगांना या धरणातून पाणी दिले जाते.

मागील वर्षी २०२३ मध्ये याच दिवशी जायकवाडी धरणात ४०.४६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. यंदा २५ मार्च २०२४ रोजी २३ टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र, गेल्या दोन महिन्यात धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटला आहे.

सध्या धरणात केवळ साडेपाच टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच दोन महिन्यात धरणातील पाणीसाठा तब्बल १८ टक्क्यांनी घटला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जायकवाडीच्या पाणीसाठ्यात तब्बल ३४ टक्क्यांची जलतूट आहे.

पिण्याच्या पाणी उपश्यासोबत १.०४० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे येत्या १० दिवसांत त्यात घट होऊन धरण मृत साठ्यावर येण्याची दाट शक्यता आहे. परिणामी संभाजीनगर, जालना या दोन मोठ्या शहरासोबतच संभाजीनगर जालना नगर जिल्ह्यातील जवळपास साडेचारशे अधिक गावांना आणखीच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

धरणातील मृतसाठ्याची क्षमता २६ टीएमसी आहे. तो वर्षभर पुरू शकणार आहे. मात्र या साठ्यात १८ टक्के गाळच आहे. तरीही या साठ्यातून मराठवाड्याला पिण्यासाठी व उद्योगाला पाणी मिळेल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. यात बाष्पीभवनाचे प्रमाण या आठ दिवसांत वाढले आहे. सध्या १.०४० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN 1st T20I: टीम इंडियाची यंगिस्तान जोमात! हार्दिकचा फिनिशिंग टच अन् बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सदस्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

SCROLL FOR NEXT