Manoj Jarange Patil Video Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मध्यरात्री ४० जणांनी माझे हात पाय दाबून धरले अन् सलाईन दिली; मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित

Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र, आज त्यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली आहे.

Satish Daud

सगेसोयरेची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र, आज त्यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली आहे. आज दुपारी गावातील महिलांना हाताने पाणी पिऊन मी माझं उपोषण स्थगित करणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

मनोज जरांगे म्हणाले, "मंगळवारी रात्री माझी तब्येत खालावल्याने मराठा बांधवांना काळजी लागली होती. त्यामुळे ४० जणांनी माझे हात पाय दाबून धरले आणि मला सलाईन दिली. माजाच्या मायेपोटी मी उपचार घेतले. आम्हाला आरक्षण पण पाहिजे आणि तुम्ही पण पाहिजे असं समाजाचं म्हणणं होतं. आमरण उपोषण मराठा समाजाची शक्ती आहे, माझी शक्ती आहे".

आमरण उपोषणाच्या शक्तीला सरकार घाबरतं. पण आता सलाईन लागल्यामुळे उपोषणाचा काही उपयोग नाही. मी सलाईन लावून उपोषण करणारा माणूस नाही. त्यामुळे आज दुपारी मी माझं उपोषण सोडणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याची घोषणा करताना राज्य सरकारला पुन्हा १ महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या १३ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा पुन्हा उपोषण सुरू करणार, असा इशारा जरांगे यांनी दिलाय.

दरम्यान, एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. यावर देखील जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्वाचे विचार दाखवण्यासाठी आम्ही नाटकाचे काम केलं होतं. त्यात आम्हाला तोटा झाला. नाटकातील पैसे काही जणांनी चोरले. त्यात माझा तिळभरही हात नव्हता, असं जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. माझ्याविरोधात अटक वॉरंट काढणं हा सर्व देवेंद्र फडणवीस यांचा खेळ आहे. मला जेलमध्ये टाकून त्यांचा मारण्याचा प्रयत्न आहे. बारा तेरा वर्षापूर्वीच वॉरंट आताच का निघालं? तसेच अटक वॉरंट काढण्याची काय गरज होती? मी काय दहशतवादी आहे काय असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणीस हे भाजपला लागलेली कीड आहे, अशी टीकाही जरांगे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT