Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News: महिनाभरापूर्वी लग्न, पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; मन सुन्न करणारी घटना

महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या एका १९ वर्षीय विवाहितेने मंगळवारी दुपारच्या सुमारास गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे.

लक्ष्मण सोळुंके

Jalna News: जालना शहरातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या एका १९ वर्षीय विवाहितेने मंगळवारी दुपारच्या सुमारास गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. साक्षी अभिजीत तायडे, असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून साक्षीने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, महिन्यापूर्वीच साक्षीचा विवाह अभिजीत तायडे या तरुणांसोबत झाला होता. विवाह झाल्यापासून अभिजित साक्षीसोबत नीट बोलत नव्हता. गेल्या एक महिन्यापासून अभिजित हा वारंवार माझा विवाह माझ्या संमतीविना तुझ्याशी लावून दिला आहे, त्यामुळे तू मला अजिबात आवडत नाही, असं म्हणत साक्षीचा छळ करत होता.

त्याचबरोबर लग्न जमवताना तुझ्या वडिलांनी बोलणी प्रमाणे हुंडा आणि लग्नात वस्तूही दिल्या नाहीत, म्हणून या महिन्यातच तुझ्या बापाकडून वस्तू घेऊन ये, असं म्हणत त्रास देत होता. आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती साक्षीने आपल्या माहेरच्या मंडळींच्या कानावर घातली होती.

मात्र, तरी सुद्धा अभिजितकडून होणारा त्रास वाढत चालल्याने अखेर साक्षीने रात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याच्या आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. इतकंच नाही, तर अभिजित तायडे यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी साक्षीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. नवविवाहितेने महिनाभरातच आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT