Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: सकाळी उठवायला गेलेल्‍या आईला बसला धक्‍का; आईला उद्देशून चिठ्ठी लिहत तरुणाने संपविले जीवन

सकाळी उठवायला गेलेल्‍या आईला बसला धक्‍का; आईला उद्देशून चिठ्ठी लिहत तरुणाने संपविले जीवन

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील शिवकॉलनी परिसरात २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Jalgaon) केली. अक्षय विलास सूर्यवंशी असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्‍महत्‍या करण्यापुर्वी अक्षयने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. (Latest Marathi News)

जळगावातील शिवकॉलनी परिसरात वास्‍तव्‍यास असलेल्‍या अक्षय सूर्यवंशी हा खासगी कंपनीत आणि मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी (२३ मे) रात्री दहाला जेवण करून झोपला होता. मध्यरात्री त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. हा प्रकार बुधवारी (ता. २४) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला. मुलगा अक्षयला पाहताच आईने हंबरडा फोडत आक्रोश केला. मृताच्या पश्चात आई मालतीबाई आणि मोठा भाऊ ओम असा परिवार आहे.

अजून त्रास नको...

आत्महत्या करण्यापूर्वी अक्षयने चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात त्‍याने 'शिक्षण झालं, पण घरच्यांच्या अपेक्षा, स्वप्न पूर्ण नाही करु शकलो. ओझं झालोय मी, अजून त्रास नाही देऊ शकत, म्हणून मी जातोय, कोणाला जबाबदार धरू नये.’ असा उल्‍लेख सुसाईड नोटमध्‍ये केलेला आहे. पोलिसांनी चिठ्ठी हस्तगत केली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरण; भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाडांना दिलासा, कोर्टाकडून निर्दोष मुक्तता

Rajabai Tower History : मुंबईचा बिग बेन! राजाबाई टॉवरच्या नावामागचा रंजक किस्सा जाणून घ्या

Maharashtra Live News Update: - एकवीस दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनाने गणेशोत्सवाची सांगता..

Local Body Election: राज्यातील निवडणुका तीन टप्प्यात होणार? अशी असू शकते निवडणूक प्रक्रिया

Dhule News: धुळ्यात अपघाताचा थरार! दोन ट्रकची जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू तर ७० बकऱ्या मृत्यूमुखी

SCROLL FOR NEXT