Jalgaon News
Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: उन्हाचा परिणाम; ११५ टक्के पाऊस तरीही तीन गावांना टँकरने पाणी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : यंदा पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली. धरणे ओव्हरफ्लो वाहिली. नद्या, नाले ओसंडून वाहिली. काही गावात अद्यापही नद्यांना पाणी आहे. पावसाळ्यात ११५ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. असे असताना जिल्ह्यात चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यात दोन टँकर तर कंडारी (ता. भुसावळ) येथे एक असे तीन टँकर सुरू करण्यात आले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे पाणीटंचाई सुरू झाल्याचे (Jalgaon News) सांगण्यात येत आहे. (jalgaon news Tanker water to three villages despite after 115 percent rain)

जिल्हा प्रशासनानेही यंदा पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे गृहित धरले होते. असे असले तरी एनवेळी टंचाई जाणवलीच तर पंचायत नको म्हणून २०२१-२२ या टंचाई कालावधीत ५०५ गावांकरिता ३ कोटी ११ लाख रुपयांचा संभाव्य कृती पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. एकूण १६ गावात विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यात (Jamner) जामनेरला सहा, एरंडोलला दोन, (Bhusawal) भुसावळला दोन, मुक्ताईनगर एक, चाळीसगाव दोन, भडगाव दोन, पारोळा एक या गावांचा सामावेश आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव, हातगाव या २ गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर कंडारी (ता. भुसावळ) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT