Jalgoan ZP saam tv
महाराष्ट्र

वाढील दहा गटांच्‍या पुनर्बांधणीत जिल्‍हा परिषदेत राजकीय फेरफार

Rajesh Sonwane

जळगाव : राज्यातील जिल्हा परिषदांच्‍या गटांच्या पुनर्रचनेत ठिकठिकाणी गटांची संख्‍या वाढणार आहे. त्‍यानुसार जळगाव जिल्‍हा परिषदेचे दहा गट वाढत आहेत. अर्थात गट वाढल्‍यामुळे सर्वच गटांमधील पुनर्बांधणी करावी लागणार आहे. या पुनर्बांधणीत जिल्‍ह्यातील बदललेल्‍या राजकीय फेरफारमुळे जिल्‍हा परिषदेतील (Jalgaon ZP) सत्तांतराची शक्‍यता देखील नाकारता येत नाही. यामुळे दोन दशकांपासून वर्षांपासून सत्तेत असलेल्‍या भाजपचा (BJP) कस लागणार आहे. (jalgaon Political changes in the Zilla Parishad in the reconstruction of the growing ten groups)

राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ आहे. परंतु, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५५ व जास्तीत जास्त ८५ असे करण्यात आले आहे. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता देखील देण्यात आली आहे. यामुळे आगामी जिल्‍हा परिषदांची निवडणूक नवीन गट रचना करावी लागणार आहे.

लोकसंख्‍येनुसार सदस्‍य संख्‍या

राज्य निवडणूक आयोग जिल्ह्यातील निर्वाचक गटांतून थेट निवडणुकीद्वारे निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या निश्चित करील. तथापि, एखाद्या जि. प.च्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या आणि निवडणुकीद्वारे भरवण्यात येणाऱ्या अशा जिल्हा परिषदेमधील जागांची संख्या यामधील प्रमाण शक्य असेल तिथपर्यंत राज्यभर सारखेच असेल. ५५ निर्वाचक गटांची किमान संख्या राज्यातील जिल्ह्यांमधील कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांसाठी नियत वाटप करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यांची लोकसंख्या विचारात घेऊन, त्या जिल्ह्यासाठी विशेष सूत्राचा अंगीकार करून काढलेल्या प्रत्येक लोकसंख्येसाठी अतिरिक्त निर्वाचक गट असेल असा निर्णय घेण्यात आला आहे.

असे वाढतील गट

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव (Chalisgaon) येथे दोन, अमळनेर, चोपडा, रावेर, जामनेर, धरणगाव (Dharangaon) येथे प्रत्येकी एक गट वाढतील असा अंदाज असून बोदवड, मुक्ताईनगर येथे गट वाढणार नसल्याचे राजकीय वर्तुळातून समजते. तर जळगाव जिल्‍हा परिषदच्‍या आगामी निवडणुकीत १० गट व पंचायत समितीचे २० गण वाढणार आहेत. जिल्‍हा परिषदेसाठी सध्‍या ६७ गट असून ते दहाने वाढून ७७ होतील. तर गणांची संख्या देखील १३४ वरून १५४ होतील असे सांगण्यात येत आहे.

राष्‍ट्रवादी येऊ शकते सत्तेत!

जळगाव (Jalgaon) जिल्‍हा परिषदेवर भाजप सत्‍ता कायम राखण्यात यशस्‍वी राहिली आहे. कारण जिल्‍ह्यात एकनाथ खडसे व गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे प्रभावी नेतृत्‍व भाजपकडे होते. परंतु, आता एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी राष्‍ट्रवादीत प्रवेश केल्‍याने जिल्‍ह्यातील राजकीय फेरबदल शक्‍य आहे. याची सुरवात जिल्‍हा परिषदेतून होऊ शकते. सध्‍याच्‍या बॉडीमध्‍ये भाजपचे ३३ सदस्‍य असून त्‍या खालोखाल १५ सदस्‍य हे राष्‍ट्रवादीचे आहेत. अर्थात खडसे यांचा पक्ष बदलानंतर गट वाढल्‍यास राष्‍ट्रवादीच्‍या सदस्‍य संख्‍येत वाढ होऊन जिल्‍हा परिषदेत सत्तांतर नाकारता येत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT