महाराष्ट्र

आजपासून टोल वसुली; काम अपुर्ण असल्‍याचे सांगत राष्‍ट्रवादीचा विरोध

आजपासून टोल वसुली; काम अपुर्ण असल्‍याचे सांगत राष्‍ट्रवादीचा विरोध

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : केंद्रीय रस्ते विभागातर्फे जळगाव जिल्‍ह्यातील नशिराबाद ते मुक्ताईनगर चौपदरी रस्त्यांचे काम सुरू आहे. त्याची टोल वसुली आजपासून (ता. १५) सुरु करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या टोल वसुलीला विरोध दर्शविला आहे. तसेच आंदोलनाचा इशारा दिला आहे. (jalgaon-news-nashirabad-Toll-collection-from-today-Opposition-of-NCP-that-the-work-is-incomplete)

नशिराबाद ते मुक्ताईनगर असा चौपदरीकरण महामार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यातील काही भागाचे काम पूर्ण झाले. नशिराबाद ते भुसावळपर्यंत रस्त्याचे काही अंशी काम झाले आहे. मात्र या रस्त्याचे बहुतांश काम बाकी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. आता याच रस्त्यावर नशिराबाद येथे टोल नाका सुरू करत आजपासून (ता.१५) हा नाका सुरू करण्यात येत असून त्याचे वाहनाचे दरही जाहीर करण्यात आले आहे.

जनतेला आतपासून भुर्दंड का?

राष्ट्रवादी काँग्रेसने हा टोल नाका सुरू होण्याच्या अगोदरच विरोध दर्शविला आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने टोल नाका सुरू करण्यास विरोध केला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी सांगितले की, या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र त्याची टोल वसुली सुरू करून जनतेला आतापासून भुर्दंड देण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने अगोदर रस्त्याचे काम पूर्ण करावे; त्यानंतर टोल घ्यावा. मात्र आता टोल सुरू करण्यास आमचा तीव्र विरोध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Ranking : टी २० रँकिंगमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताचा दबदबा; संजू सॅमसननं घेतली मोठी झेप, टॉप १० मध्ये कोण-कोण?

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Beed: बीडमध्ये गॅस टंचाईत सिलिंडरचा काळाबाजार, सिलिंडरने भरलेले ३ ट्रक लपवून ठेवले

Maharashtra Live News Update: चाकण औद्योगिक क्षेत्रात फटका; 30% कंपन्या ठप्प होण्याच्या मार्गावर

Jio Recharge: खुशखबर! कॉलिंग-डेटाचं टेन्शन संपलं! 1 रिचार्ज प्लानमध्ये 200 दिवसांची वैधता; पण किंम्मत किती?

SCROLL FOR NEXT