Jalgaon News Heat Wave
Jalgaon News Heat Wave Saam tv
महाराष्ट्र

Heat Wave: जळगावचे तापमान ४७ अंश पार; सलग चार दिवसांपासून सर्वांत हॉट

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यात ‘अल निनो’ च्या प्रभावामुळे सलग चौथ्या दिवशी जळगाव जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक ‘हॉट’ ठरतोय. वेलनेस वेदर या खासगी संस्थेने (Jalgaon) जळगावचे कमाल तापमान तब्बल ४६.७ अंश तापमानाची (Tempreture) नोंद केली आहे. तर ममुराबादच्या शासकीय हवामान केंद्रात जळगावच्या कमाल तापमानाचा पारा ४५ अंश नोंदला गेला. (Maharashtra News)

जळगाव जिल्ह्यात आठवड्यापासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांत तर कमाल तापमानाची विक्रमी नोंद झाली. केवळ आठवड्याभरात कमाल तापमानातील फरक ७ ते ८ अंशांवर पोचला असून, त्यामुळे नागरिक या उष्म्यात अक्षरश: होरपळून निघत आहेत. जळगावसह जिल्ह्यातील शहरांचे गेल्या (Jalgaon Tempreture) आठवड्यापासून तापमान ४३ ते ४४.९ अंशांवर नोंदले जात आहे. शनिवारी जळगावचे कमाल तापमान ४५ अंश नोंदले गेले, तर वेलनेस वेदर या खासगी एजन्सीच्या दाव्यानुसार जळगावचे कमाल तापमान ४७.२ अंश होते. दुपारी तीन ते पावणे चार दरम्यान ४८.५ अंश तापमान असल्याची जाणीव होत होती.

जिल्‍ह्यात सर्वत्र पारा ४५ पार

भुसावळ, वरणगाव, चोपडा या शहरांमध्येही कमाल तापमानाचा पारा ४६ अंशांवर पोचला आहे. तापमान वाढीमुळे शहरासह जिल्ह्यातील रस्ते र्निमनूष्य होताहेत. महामार्गावरील वाहतूकही दुपारी थांबलेली दिसते. अनेक वाहनधारक महामार्गा शेजारी असलेल्या झाडाच्या सावलीत थांबलेली दिसतात. तर तापमानातील वाढीचा पक्षांवरही परिणाम झाला आहे. दुपारी बारापासूनच कावळे, कबुतर, चिमण्या आदी पक्षी दिसेनासे होतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

SCROLL FOR NEXT