अतिवृष्‍टी 
महाराष्ट्र

जामनेर तालुक्‍यात अतिवृष्‍टी; अनेक गावांमध्‍ये शिरले पाणी

जामनेर तालुक्‍यात अतिवृष्‍टी; अनेक गावांमध्‍ये शिरले पाणी

संजय महाजन

जळगाव : जामनेर तालुक्यातील अनेक गावांमध्‍ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिला. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतातील कपाशी, सोयाबीन, मका, केळी, तुर हे पिक देखील भुईसपाट झाले आहेत. (jalgaon-news-Heavy-rainfall-in-Jamner-taluka-Water-seeped-into-many-villages)

जळगाव जिल्‍ह्यातील जामनेर तालुका परिसरात सोमवारी मध्‍यरात्रीनंतर अतिवृष्टीने झोडपले. तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे भागदरा, तोंडापूर व ओझर या गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रामुख्याने तालुक्यातील ओझर गावामध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास चक्रीवादळ अतिवृष्टी झाली. भागदरा या गावातील काही घरांमध्ये पाणी शिरले.

शेताचे मोठे नुकसान

मुसळधार पावसामुळे अनेक शेतातील कपाशी वाहून गेली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच तोंडापूर या गावामध्ये नदीला पूर आल्यामुळे दोघा गावाचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने ओझर, तळेगाव, टाकळी आणि तोंडापूर या गावांमध्ये तुलनेत जास्त हानी झाली आहे.

तात्‍काळ मदतीच्‍या सुचना

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य करण्याच्‍या सुचना दिल्‍या आहेत. गावांमध्ये पाणी शिरले असून शासकीय पातळीवर तात्काळ मदत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. याबाबत तहसीलदार अरूण शेवाळे व त्‍यांची टीम आपत्तीग्रस्त गावांना भेटी देत असून त्यांनी मदतकार्य पोहचवित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरला, भाजपच्या मंत्र्याची राजधानीत घोषणा

Maharashtra Live News Update: अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाचे शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतले शैक्षणिक पालकत्वं

Maharashtra Politics: विलिनीकरणावरून वाद पेटला; अजित पवार गटाच्या आमदाराचा शरद पवार गटावर हल्लाबोल

मोठी बातमी! भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नाही, कारण आलं समोर

राज्यात मोठी घडामोड! भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे; पत्रावर घेतली स्वाक्षरी? नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT