Jalgaon News
Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: वरच्‍या खोलीत आजोबांना पाहून नात घाबरून आली खाली; घडल्‍या प्रकाराने कुटूंब हादरले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील हरीविठ्ठील नगर परिसरातील कोठारीनगरात वास्‍तव्‍यास असलेल्‍या ६० वर्षीय वृध्दाने घरातील वरच्या मजल्यावर दोरीने (Jalgaon News) गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना २६ फेब्रुवारीला सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर (Police) पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

पंढरी हरीदास चव्हाण (वय ६०) असे मृत वृध्दाचे नाव आहे. रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहितीनुसार पंढरी चव्हाण हे पत्नी व दोन मुलांसह जळगावातील कोठारीनगरात वास्तव्याला आहेत. आठवडे बाजारात भाजीपाला विक्री करून परिवाराचा उदरनिर्वाह करत हेाते. दरम्‍यान रविवारी (२६ फेब्रुवारी) सायंकाळी त्यांनी परिसारसोबत गप्पा मारल्या. त्यानंतर आराम करण्यासाठी वरच्या मजल्यावरील खोलीत गेले. तिथे त्यांनी दोरीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली.

नात वरच्‍या खोलीत गेली तेव्‍हा समजले

सायंकाळी सातच्‍या सुमारास पंढरी चव्हाण यांची नात निकिता ही वरच्या खोलीत गेली. यावेळी आजोबा दोरीच्‍या सहाय्याने लटकलेले दिसले. घाबरलेल्‍या अवस्‍थेत निकिती ही खाली आली. घरात तिने सदरचा प्रकार सांगितला. पंढरी चव्हाण यांनी आत्महत्या केल्याचे पाहून कुटुंबियांनी हंबरडा फोडला. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पो.ना. रेवानंद साळुंखे करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : प्रमोद महाजन असते तर मोदी पंतप्रधान असते का? इंडिया आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

Benifits of Curry leaves: सकाळी उठल्यावर कढीपत्याचे पाणी प्या; आरोग्याला होतील अनेक फायदे

Raj Thackeray Demands: मुंबई-गोवा महामार्ग, रेल्वे अन् बरंच काही; भरसभेत राज ठाकरेंच्या PM मोदींकडे या महत्त्वाच्या मागण्या

Today's Marathi News Live: दिल्लीत हरवता येत नाही म्हणू माझ्या अटकेचं कारस्थान, अरविंद केजरीवाल यांचा गंभीर आरोप

PM Modi Speech: काँग्रेसने देशाची ५ दशकं वाया घालवली; शिवाजी पार्कातून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT