Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यूने गाठले; अपघातात तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : दोन्ही मित्र ११ नोव्हेंबरला रात्री १० ते १२ वाजेच्या दरम्यान मोटरसायकलने दुचाकीवरून भुसावळकडून जळगावकडे जात होते

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव- भुसावळ महामार्गावरील रस्त्यावर मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यु झाला आहे. वाढदिवसाच्या दिवशीच या तरुणाचा मृत्यूने गाठले आहे. तर त्यांचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना घडली तालुक्यातील कोरपावली परिसरात घडली आहे. 

तालुक्यातील कोरपवली येथील राहुल संतोष सोनवणे (वय २१) व दिपक उर्फ देवेन्द्र दत्तु तायडे (वय २३) हे दोन्ही मित्र ११ नोव्हेंबरला रात्री १० ते १२ वाजेच्या दरम्यान मोटरसायकलने दुचाकीवरून भुसावळकडून (Jalgaon) जळगावकडे जात होते. यावेळी महामार्गावरील गोदावरी हॉस्पीटलजवळ असलेल्या एका ढाब्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक बसताच दुचाकीवरील (Accident) दोघेजण दिल्याने रस्त्यावर फेकले गेले. यात दोघेजण गंभीर जखमी झाले होते. 

दरम्यान या भीषण अपघातात राहुल सोनवणे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेला दीपक हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेचे वृत्त कळताच कोरपावली गाव व परिसरात सर्वत्र एकच शोककळा पसरली आहे. संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT