Manoj Jarange Patil Protest Latest Update Saamtv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Protest: अखेर १७ व्या दिवशी उपोषण मागे... CM शिंदेंची यशस्वी मध्यस्थी; काय म्हणाले जरांगे पाटील?

Manoj Jarange Patil Protest Latest Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर जरांगे पाटील यांनी १७ व्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे.

माधव सावरगावे

Manoj Jarange Patil Protest:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनीउपोषण सुरू केलं आहे. उपोषणाच्या १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले.

काय म्हणाले जरांगे पाटील?

मुख्यमंत्र्याच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अखेर उपोषण सोडले आहे. मात्र असले तरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. "मी समाजाच्या हिताचाच निर्णय घेईन. मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईन आणि तशीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीही आहे. असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

"मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलन शांततेत करायचे आहे. हे आरक्षण मिळवल्याशिवाय मी मागे हटणार नाही, मराठा समाजाला एकनाथ शिंदेच न्याय देवू शकतात असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मंत्री संदिपान भुंबरे, आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राजेश टोपे आदी नेते यावेळी उपस्थित होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT