सांगलीत पूर येऊन 9 दिवस झाले; अध्याप शेतीचे पंचनामे नाही  Saam Tv
महाराष्ट्र

सांगलीत पूर येऊन 9 दिवस झाले; अध्याप शेतीचे पंचनामे नाही

सांगली जिल्ह्यात (Sangali District) तिसऱ्यांदा महापूर आला, आणि होत्याच नव्हतं झालं. आधीच कोरोनाचा (Coronavirus) फटका आणि त्यात महापूर आला.

विजय पाटील

सांगली जिल्ह्यात (Sangali District) तिसऱ्यांदा महापूर आला, आणि होत्याच नव्हतं झालं. आधीच कोरोनाचा (Coronavirus) फटका आणि त्यात महापूर आला. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे. मात्र नेते मंडळी दौरे करत आहेत. मात्र मदत कधी मिळणार या विवंचनेत शेतकरी आहेत. तब्बल नऊ दिवस झाले अध्यप पंचनामे झालेच नाहीत.

सांगली जिल्ह्यात 2005 ला पहिला पूर आला. त्यानंतर 2019 ला आणि आता 2021 ला महापूर आला. याचा फटका सांगली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. आधीच 2019 ला महापूर आला. त्यातून सांगली सावरत होती. त्यातच कोरोनाने गाठले आणि लगेच 2021 चा महापूर यात शेतकरी आणि नागरिक खचला आहे.

सांगलीला महापूर आल्याने ग्रामीण भागातील तब्बल 108 गांव बाधित झाली. तर अनेक गावांना पुराचा वेढा घातला होता. या पुरात अनेकांचं संसार उघड्यावर पडले तर अतोनात नुकसान झाले. त्यातच शेतीला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती सुद्धा वाहून गेली आहे. ऊस, सोयाबीन, पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

पूर येऊन तब्बल नऊ दिवस झाले पण अध्यप ही शेतकऱ्याच्या बांधावर शासकीय अधिकारी पोहचले नाहीत. कोणतेही पंचनामे झाले नाहीत. शेतकरी शासनाच्या मदतीची आस धरून बसला आहे.

एकीकडे पूर येऊन गेल्यावर अनेक नेते मंडळी पूर पाहणी करण्यासाठी सांगली जिल्ह्यात दौरे करत आहेत. अनेकांनी आश्वासन दिले आहेत. पण शेतकऱ्याला काही मदत मिळेना झाली आहे. माय बाप सरकार शेतकऱ्याला पॅकेज जाहीर करेल याची आस धरून बसला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat: मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर

पुढच्या आठवड्यात बारावीचा निकाल, दहावीच्या रिझल्टवरही अपडेट, mahresult.nic.in वर पाहा

TB cases Maharashtra: पुणे, नाशिक ते कोल्हापूर, नागपूरसह ११ हजार गावात टीबीचा विळखा, काय काळजी घ्याल? वाचा लक्षणं

Homemade Hair Mask Tips: उन्हामुळे केस कोरडे पडलेत? 'हे' 3 होममेड हेअर मास्क लावा, सिल्की आणि शायनी होतील तुमचे केस

SCROLL FOR NEXT